नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेतील १३ तर राज्यसभेतील एका खासदाराला निलंबित करण्यात आलं होतं. यात आज देखील यावरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडला. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा मिळून असे एकूण ९२ खासदारांवर निलंबणाची कारवाई करण्यात आलीय. ही संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई मानली जाते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टिकास्त्र सोडलंय.
हेही वाचा…ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेकडून खिंडार ; तब्बल १०७ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
भारताच्या इतिहासातील सर्वात डरपोक सरकार आहे. एका दिवसात लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण ७८ खासदारांना निलंबित करून भारताच्या इतिहासातील हे सर्वात डरपोक सरकार असल्याचं मोदी सरकारने स्वत : सिद्ध केलंय. संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा असतानाही पंतप्रधान आणि गृहमंत्री त्यावर संसदेत निवेदन देत नाहीत, ही अतिशय गंभीर बाबत आहे. त्याउलट निवेदनाची मागणी करणाऱ्या खासदारांचं निलंबन करतात हा खरंतर लोकशाहीचा अपमान असल्याचं आव्हाडांनी म्हटलंय.
हेही वाचा…एका दिवसात तब्बल ३३ खासदार निलंबित ; मोठं कारण आलं समोर
बहुमत असूनही पत्रकार परिष न घेणारं, विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन करणारं, महत्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा घडवून न आणणारं हे डरपोक सरकार आहे लोकप्रतिनिधींची तोंड बंद केली जात आहेतच, पण सामान्य नागरिकांनीही याविषयी वेळीच आवाड उठवला नाही, तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही. अशी शक्यता देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
संसद सुरक्षाविषयी चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी मागील दोन ते तीन दिवसापासून लावून धरली आहे. परंतु त्यावर लोकसभा अध्यक्ष चर्चा करण्यास नकार देत आहेत. यामुळे लोकसभेचं कामकाज सुरू होण्याच्या आधीच खासदारांनी सभागृहात गोंधळ घातलाय. यामुळे एका दिवसात ७८ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. तर आतापर्यंत ९२ खासदार संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून निलंबित झाले आहेत. यामध्ये लोकसभेत ४६ तर राज्यसभेत ४६ खासदारांचा समावेश आहे.
हेही वाचा…पिंपरी चिंचवड पालिकेत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार ; आयुक्तासंह,अधिकारी अन् नेत्याचे दाबे दणाणले, प्रकरणात बंटी बबलीची एन्ट्री
दरम्यान, राज्यसभेतील ३४ विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. सभापतींचे आदेश न पाळल्यामुळे या खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यामध्ये प्रमोद तिवारी, जयराम रमेश, अमी याज्ञिक, नारायण भाई राठवा, शक्ती सिंह गोहिल, रजनी पाटील, सुखेंदू शेखर, नदीमुल हक, एन. षणमुगम, नसीर हुसेन, फुलोदेवी नेताम, इम्रान प्रतापगढ़ी, रणदीप सुरजेवाला, मौसम नूर, समीरूल इस्माम, रणजीत रंजन, कनिमोझी, फैयाज अमजद, मनोज झा, रामनाथ ठाकूर, अनिल हेडगे, वंदना चव्हाण, रामगोपाल यादव, जावेद अली खान, जोसे मनसे, जोशी. महुआ मांझी आणि अजित कुमार यांचा समावेश आहे.
“भारताच्या इतिहासातील सर्वात डरपोक सरकार”
एका दिवसात लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण ७८ खासदारांना निलंबित करून भारताच्या इतिहासातील हे सर्वात ‘डरपोक सरकार’ असल्याचं मोदी सरकारने स्वत: सिद्ध केलं आहे.
संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा असतानाही पंतप्रधान…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, ९२ खासदार निलंबित, राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारांचाही समावेश”
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी ४४ हजार कोटीचं पॅकेज जाहीर
हेही वाचा…मोठी बातमी..! मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर
हेही वाचा…“लोकसभेतील ४६ खासदारांवर निलंबणाची कारवाई,” सुप्रिया सुळे म्हणाल्या..
हेही वाचा..ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कारागृहात रवानगी, पुढचा मुक्काम ‘या’ जेलमध्ये