नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. गेल्या दीड वर्षात आपत्तीत, संकटात आमचं युती शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलंय. कुणीही केली नसेल इतकी विक्रमी मदत आम्ही करतोय. आमचं ते कर्तव्यही असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तर मागच्याच अधिवेशनातील भाषण मुख्यमंत्र्यांनी वाचून दाखवलंय अशी टिका करत विरोधकांनी सभात्याग केला.
हेही वाचा…पिंपरी चिंचवड पालिकेत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार ; आयुक्तासंह,अधिकारी अन् नेत्याचे दाबे दणाणले, प्रकरणात बंटी बबलीची एन्ट्री
एकनाथ शिंदे म्हणाले की, जुलै २०२२ पासून म्हणजे गेल्या फक्त १८ महिन्यात शेतकऱ्यांसाठी जो भरीव निधी खर्च करीत आहोत. यामध्ये मदत व पुनर्वसन विभागाकडून १४ हजार ८९१ कोटी रुपये कृषि विभागाकडून १५ हजार ४० कोटी रुपये, पशुसंवर्धन २४३ कोटी, सहकार ५ हजार १९० कोटी, पणन ५ हजार ११४ कोटी, अन्न व नागरी पुरवठा ३ हजार ८०० कोटी अशा रीतीनं एकूण ४४ हजार कोटीपेक्षा जास्त खर्च आम्ही करीत आहोत. याला मी पॅकेज म्हणणार नाही कारण शेतकरी आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. बळीराज्याच्या आयुष्यात आनंदाचे दिवस आले पाहिजेत. त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास दर वाढविण्यासाठी यापेक्षा सुद्धा जास्त निधी लागला तरी त्याची तरतूद केली जाईल आणि तो खर्चही केला जाईल. कुठेही कुणीही राजकारण आणता कामा नये. आपण सर्व जण मिळून त्याच्यात आत्मविश्वास निर्माण करू या.
हेही वाचा…“महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय”, राऊतांची सरकारवर जोरदार टिका
दरम्यान, गेल्या दीड वर्षात दुष्काळ असेल, अतिवृष्टी असेल, अवकाळी असेल, पूर असेल, गारपीट असेल… प्रत्येक आपत्तीत, संकटात आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं आहे. कुणीही केली नसेल इतकी विक्रमी मदत आम्ही करतो आहोत…. तब्बल ४४ हजार कोटी रुपये आमचं सरकार कृषि क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी खर्च करत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर
हेही वाचा…“लोकसभेतील ४६ खासदारांवर निलंबणाची कारवाई,” सुप्रिया सुळे म्हणाल्या..
हेही वाचा..ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कारागृहात रवानगी, पुढचा मुक्काम ‘या’ जेलमध्ये
हेही वाचा…ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेकडून खिंडार ; तब्बल १०७ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा…एका दिवसात तब्बल ३३ खासदार निलंबित ; मोठं कारण आलं समोर