मुंबई : राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विपश्यनेची गरज आहे. एका कर्तबगार नेत्याला त्यांच्या दोन ज्युनिअरच्या हाताखाली काम करावं लागंतय, ही अस्वस्थता आहे. त्यामुळे त्यांना विस्मरण होतंय. दिल्लीतून कारभार चालवला जातो. महाराष्ट्र हा दिल्लीचा दास किंवा गुलाम झाला आहे. महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय, अशी टिका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर केली आहे.
हेही वाचा...राष्ट्रवादी हा मराठ्यांचा पक्ष, असे आजपर्यंत कुणी हिणवलं ? फडणवीसांना शरद पवार गटाचा तिखट सवाल
मराठा आरक्षणासंदर्भात आज माजी खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक बैठक बोलावली आहे. यावर बोलतांना संजय राऊतांनी म्हटलंय की, संभाजीराजे यांच्या बैठकीकडे आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्यांनी बोलावलेल्या बैठकीला आमचे नेते उपस्थित राहतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“बिनडोक, दुरदृष्टी नसलेला व्यक्तीच्या दबावापोटी लोकांच्या भविष्याशी खेळणे सरकारला शोभते का?” रोहित पवारांचा रोख कुणाकडे ?
दरम्यान, इंडियाची बैठक आता दिल्लीत होणार आहे. त्यावर इंडियाच्या बैठकीला सर्व घटकपक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे आज राजधानी दिल्लीत जाणार आहेत. उद्धव ठाकरे- केजरीवाल यांची भेट पुर्वनियोजित असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा...सलीम कुत्ता प्रकरणाबाबत राजकीय हालचाली वाढल्या ; ठाकरे गटातील नेत्याच्या अडचणी वाढल्या
हेही वाचा…विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतर काॅंग्रेस पुन्हा कामाला लागली, दिल्लीत २१ तारखेला महत्वाची बैठक
हेही वाचा…“शिवसेनेचा वाघ येतोय..,”अदानी विरोधातील मोर्चातील मागण्या कोणत्या ?
हेही वाचा…ठाकरेंच्या मोर्चासाठी जालन्यातील युवक पेटती मशाल घेऊन मुंबई दाखल, मोर्चाला थोड्याच वेळात होणार सुरूवात
हेही वाचा…हॉर्स रायडिंग मैदानाची ‘रेस’ : ते आले…त्यांनी भेट दिली…जिंकून गेले सारे! खासदार अमोल कोल्हे यांना ‘राजकीय मायलेज’