मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापत आहे. यातच मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला येत्या २४ तारखेपर्यंत आरक्षण देण्याची मुदत दिलीय. यातच मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी राज्य सरकारकडून शिंदे समिती स्थापन करण्यात आली आहे. यातच आता शिंदे समितीने आपला दुसरा अहवाल राज्य सरकारकडे सुपुर्द केला आहे. याआधी पहिला अहवाल ३१ ऑक्टोंबरलाच सादर करण्यात आला होता. आज विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा समाजाला आरक्षण कसं देणार ? त्यावर भाष्य करणार आहेत.
हेही वाचा…“लोकसभेतील ४६ खासदारांवर निलंबणाची कारवाई,” सुप्रिया सुळे म्हणाल्या..
मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत राजकीय हालचाली वाढल्या आहेत. काल मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली जात आहे. आज विधानसभेत मुख्यमंत्री आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत.
हेही वाचा…ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कारागृहात रवानगी, पुढचा मुक्काम ‘या’ जेलमध्ये
दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने अजूनही ठोस पाऊले उचलली नाहीत. यातच आता मुंबईत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात केली जात आहे. काल माजी खासदार संभाजी राजे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे. अशी भूमिका या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात पुढील काही दिवसात काय राजकीय घडामोडी घडणार ? ते पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“‘त्या’ व्हिडीओत बडी भाभी म्हणजे तुम्हीच का ?” सलीम कुत्ता प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी देवयानी फरांदेंना डिवचलं
हेही वाचा…“तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबणाच्या कारवाईवर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
हेही वाचा…“संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, ९२ खासदार निलंबित, राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारांचाही समावेश”
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी ४४ हजार कोटीचं पॅकेज जाहीर
हेही वाचा…मोठी बातमी..! मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर