नागपुर : कापुस आणि सोयाबीन प्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या कार्यकर्त्यांसह रविकांत तुपकर हल्लाबोल आंदोलन करत विधानभवनावर धडक मारण्याच्या अगोदर रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर तुपकरांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आलीय.
हेही वाचा…“संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, ९२ खासदार निलंबित, राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारांचाही समावेश”
सोयाबीन, कापसाला दरवाढ मिळावी, या मागणीसाठी रविकांत तुपकर मागील काही दिवसापासून आंदोलन करीत आहेत. यासाठी त्यांनी अन्नत्याग उपोषण देखील केलं. परंतु सरकारने काही मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी तो उपोषण मागे घेतलं. यातच आता उर्वरित मागण्या देखील मान्य व्हाव्यात यासाठी त्यांनी नागपुरात धडक मोर्चाची हाक दिलीय. आपल्या कार्यकर्त्यांसह विधानभवनात जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी ४४ हजार कोटीचं पॅकेज जाहीर
दरम्यान, रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टिका केली आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे झाल्यावर महाराष्ट्राला पनवती लागली असल्याची टिका रविकांत तुपकर यांनी केलीय. तसेच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. असंही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“उगीच मी हुडी, गॉगल घालून फिरत नाही”, ठाकरेंचा फडणवीसांना खोचक टोला
हेही वाचा…“शरद पवारांचा कार्यकर्ता, जरांगेंसोबतही चांगले संबंध,” अंतरवाली सराटी घटनेतील आरोपीची प्रतिक्रिया
हेही वाचा…मराठा आरक्षणासंदर्भात राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसोबत सरकारची रणनीती ठरली ?
हेही वाचा…“‘त्या’ व्हिडीओत बडी भाभी म्हणजे तुम्हीच का ?” सलीम कुत्ता प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी देवयानी फरांदेंना डिवचलं
हेही वाचा…“तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबणाच्या कारवाईवर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया