मुंबई : दिल्लीत आम्ही लोक राहतो. दिल्लीत सगळ्या राज्य सरकारची निवासस्थानं आहेत आणि सगळ्यात उत्तम निवासस्थान कुणाचं असेल, तर ते महाराष्ट्राचं आहे. लोक म्हणतात हे कोणी केलं, तर ते छगन भुजबळांनी केलं राज्य सरकारची गुंतवणूक न करता, ही अतिशय उत्तम वास्तू , दिल्लीच्या सौंदर्यात भर टाकेल अशी वास्तू त्यांनी बांधली. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की शिवसेनेचं नेतृत्व त्यांनी केलं, पहिला विधानसभेचा आमदार म्हणून ते निर्वाचित झाले. तत्पूर्वी मुंबई महापालिकेत महापौर बनून या शहराचं नेतृत्व त्यांनी केलं. असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी म्हटलं आहे.
निवडणुकीआधी ठाकरेंनी रण जिंकला..! हायकोर्टात ठाकरेंच्या बाजूने निर्णय
ज्यांची काही पार्श्वभूमी नाही. अशी एखादी व्यक्ती महापौर बनते, मुंबई शहरात आपलं प्रस्थ प्रस्थापित करते, विधानसभेत जातात, विरोधी पक्षाचा नेता होतात. राज्याच्या मंत्रीमंडळात जातात आणि संबंध महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम करतात. असं आगळंवेगळं उदाहरण भुजबळांशिवया दुसरं क्वचितच बघायला मिळेल. असं गौरव उद्धार देखील शरद पवारांनी काढलं आहे.
शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतलेत, हिमंत असेल तर मैदानात या..! उद्धव ठाकरेंचा एल्गार
छगन भुजबळांच्या राजकीय कारकीर्दीचं वर्णन धगधगता अंगार म्हणून करावं लागेल. आपल्या वाणीने आणि कर्तृत्वाने त्यांनी महाराष्ट्राचा जनमाणूस आपलासा केला. त्यांनी लाखोंच्या सभा गाजवल्या त्याचबरोबर विधिमंडळाचं सभागृहही दणाणून सोडलं. त्यांच्या कार्यकुशल राजकारणाचा आम्ही अनुभव घेतलाय. पवारसाहेबांनी एखादी जबाबदारी द्यायची आणि भुजबळांनी ती फत्ते करायची, हे समीकरण होतं. असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलं आहे.
Read also
- “विलासरावांचं पडलेलं सरकार भुजबळांनी वाचवलं, आणि आज..” अजित पवार
- “उद्धव ठाकरे अन् राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्यावं, मी आयोगाला पत्र पाठवणार”
- “भविष्य अंधारात ढकलण्याचे पाप करू नये”; काॅंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “हा वाघ बाहेर येताच पहिला वाघ नखाचा पंजा कोणाला मारणार ?”
- “गृहविभाग आता फडणवीस सांभाळताहेत, समाजकंटकांनी लक्षात घ्या”; गिरीश खत्री