मुंबई : शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करून त्यांना खंजीर चिन्ह दिलं पाहिजे होतं. यांना मशाल आता रूजवायला वेळ लागेल. खंजीर म्हटलं तर लोकांच्या लक्षात आलं असतं. राष्ट्रवादीच्या जन्मच खंजीरातून झालेला आहे आणि आता नवा एक खंजीर घुसवणारा निर्माण पवारांनी केलेला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून सेना आणि राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्या, असं मी निवडणुक आयोगाला पत्र लिहीन मात्र फक्त ते खंजीर एकमेकांत घुसवू नका. असा टोला भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
“जर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर ते मुख्यमंत्री झाले असते”; उद्धव ठाकरे
भाजप आणि शिवसेना यामध्ये अंतर आलं पाहिजे. असं शरद पवारांनी म्हटलं होतं. त्यांना शिवसेनेला पुर्णपणे संपवायचं होतं. ते त्यांनी केलं. एक राजा होता आणि त्याचा हात लागला तर कुठल्याही वस्तुचं सोनं होतं. असं मी एकलं होतं. बारामतीच्या तथाकथित जाणता राजाचा हात लागला तर राख होते, ते आता मी प्रत्यक्षात बघितलं आहे. राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल त्याची राख होत आहे. शिवसेनेचं काय झालं. ? ते आपल्या समोर आहे. असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
अगोदर शिवसेना त्यानंतर मैदान, मग धनुष्य़बाण आणि आता अंधेरी पोटनिवडणुकमध्ये शिंदे आणि ठाकरे आमनसामने आले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा जाणूनबुजून शिंदे सरकार रोखून धरत आहे. असा आरोप ठाकरेंकडून केला जात आहे. यातच ऋतुजा लटके यांनी महापालिकेला राजीनाम्यासंदर्भात दोन अर्ज केल्याचे उघड झाले आहे.
Read also
- “भविष्य अंधारात ढकलण्याचे पाप करू नये”; काॅंग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- “हा वाघ बाहेर येताच पहिला वाघ नखाचा पंजा कोणाला मारणार ?”
- “गृहविभाग आता फडणवीस सांभाळताहेत, समाजकंटकांनी लक्षात घ्या”; गिरीश खत्री
- निवडणुकीआधी ठाकरेंनी रण जिंकला..! हायकोर्टात ठाकरेंच्या बाजूने निर्णय
- शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतलेत, हिमंत असेल तर मैदानात या..! उद्धव ठाकरेंचा एल्गार