मुंबई : गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अद्यापही दिलासा मिळाला नाही. मात्र यातच आता मुंबई उच्च न्यायालयाने अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना दिलासा देत आयुक्तांना फटकारत ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला आहे. तसेच उच्च न्यायालयाने शिवाजी पार्क मैदानासंदर्भात देखील ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला होता. त्यामुळे आता संजय राऊत देखील तुरूंगातून लवकरच बाहेर येतील अशी आशा शिवसैनिकांना लागून राहिली आहे.
राज्यातील मागील काही घटनांवरून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हे शिवसेना ठरली आहे. अनेक घडामोडी राज्यात शिवसेनेच्या घडत आहेत. एकमेकांना आरोप-प्रत्यारोप करण्याची कोणीही संधी सोडत नाही. यातच संजय राऊतांना उद्देशून हा वाघ बाहेर येताच पहिला वाघ नखाचा पंजा कोणाला मारणार ? असा सवाल शिवसेनेच्या नेत्या शिल्पा बोडके यांनी केला आहे.
“शिंदे सरकार आल्यापासून राज्यपाल रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात”; राष्ट्रवादीने डिवचलं
संजय राऊत यांच्यावर भाजपचे नेते सातत्याने टिका करीत होते. यामध्ये किरीट सोमय्या, नारायण राणे यांनी संजय राऊतांवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. त्यामुळे संजय राऊत तुरूंगातून बाहेर आल्यावर यांच्यावर कडाडून हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे.
हा वाघ बाहेर येताच पहिला वाघ नखाचा पंजा कोणाला मारणार….?? pic.twitter.com/X2hzBw1tht
— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) October 12, 2022
Read also
- “गृहविभाग आता फडणवीस सांभाळताहेत, समाजकंटकांनी लक्षात घ्या”; गिरीश खत्री
- निवडणुकीआधी ठाकरेंनी रण जिंकला..! हायकोर्टात ठाकरेंच्या बाजूने निर्णय
- शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतलेत, हिमंत असेल तर मैदानात या..! उद्धव ठाकरेंचा एल्गार
- “जर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर ते मुख्यमंत्री झाले असते”; उद्धव ठाकरे
- “नागपुरचा नासका कांदा बाहेर फेकला पाहिजे, तरच राज्याची राजकीय परिस्थिती सुधारेल”; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला