मुंबई : आज प्रत्येक गोष्टासाठी कोर्टात जाव लागत आहे. परंतु हिमंत असेल तर मैदानात या… ना.. मी तयारच आहे. असं म्हणत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन दिलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या गौरव समितीच्या वतीने राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीतर्फे कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
“पालिकेला ऋतुजा लटकेंनी दोनदा अर्ज केले”; शिंदे सरकारकडून विनाकारण अडवणुक ?
छगन भुजबळ तुम्ही ज्या दिवशी शिवसेना सोडली होती. त्यादिवशी आमच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर आम्हाला सावरताना खुप वेळ लागला ह. मात्र बाळासाहेब असताना ते प्रकरण आपण मिटवून टाकलं. परंतु त्या दिवशी मासाहेब राहिली असती तर चांगलं झालं असतं. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी जुनी आठवण सांगितली.
“अण्णाभाऊ साठे सभागृहाचं काम लवकरात लवकर व्हावं”; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अडीच वर्षापासून महाराष्ट्रात एक वेगळ समीकरण आपण यशस्वी करून पाहिलं. मात्र ते समीकरण बघून गुब्बारे आले आहेत. विधानसभेतील भाषण अनेकदा गॅलिरीतून येऊन ऐकलं आहे. मात्र सध्या राजकारणाचा विचार न करता विचारांनी राजकारण करत नाही. सध्याचं चित्र आहे. छगन भुजबळांनी पहिली निवडणूक हरले होते. मात्र ते पुन्हा जिद्दीने उभे राहिले आहेत, आणि आजही आहेत. असंही ते म्हणाले.
“भाजपची वाण नाही पण गुणात वाहून तुमची प्रतिमा मलिन करू नका”; रूपाली पाटील
आज प्रत्येक गोष्ट कोर्टात जावी लागते. परंतु हिमंत असेल तर मैदानात या ना. असंं आवाहन देखील उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. मी मैदानाच उतरलो आहे. त्यामुळे या मैदानात लढा. असंही ते म्हणाले. अनेक वादळ शिवसेनेने अंगावर घेतले आहेत. तसेच राष्ट्रवादी सह अनेक नेते वादळ आमच्यासोबत असल्याने मी तर लढाईच्या क्षणाची वाट पाहत आहे. विचारांची धगधगती मशाल, शिवसेनेचे जाताना एकटे गेले पण आख्खी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत घेऊन आले आहे.
Read also
- “नागपुरचा नासका कांदा बाहेर फेकला पाहिजे, तरच राज्याची राजकीय परिस्थिती सुधारेल”; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला
- “नागपुरचा नासका कांदा बाहेर फेकला पाहिजे, तरच राज्याची राजकीय परिस्थिती सुधारेल”; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला
- “शिंदे सरकार आल्यापासून राज्यपाल रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “अनिल परबांचा डाव ओळखावा..”! मनसेच्या आरोपामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट
- “लटकेंचा राजीनामा स्वीकाराला नाही तर…..ठाकरेंकडे आहेत हे तीन पर्याय”