मुंबई : राज्यातील राजकारण गेल्या अनेक वर्षापासून वेगळ्याच वळणावर निघून गेलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर झाल्याचा आरोप करण्यात आला. अनेक नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरूंगात डांबण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसला. यावरूनच आता राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
“भाजपची वाण नाही पण गुणात वाहून तुमची प्रतिमा मलिन करू नका”; रूपाली पाटील
महाविकास आघाडी सरकार पाडण्यामागे आणि शिवसेनेत फुट पाडण्यात देवेंद्र फडणवीस यांचा मोठा हात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. केंद्रात भाजपची सत्ता असल्याने राज्यात सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकते. तसेच शिवसेनेला संपवून मुंबई महापालिकेत सत्ता मिळवणे इतकेच फडणवीसांचे लक्ष्य आहे. असा आरोप विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
“बंडखोरांच्या मतदार संघात फिरून आलो, लोक म्हणतात यांचे डिपॉझिट जप्त होणार”
तसेच राज्यात ज्याकाही राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यांना भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसचं कारणीभूत आहेत. असा अप्रत्यक्ष टोला राष्ट्रवादीने लावला आहे. एक कांदा नासला की तो इतर कांद्यांना नासवतो. इतर कांदे नासू नयेत म्हणून नासका कांदा फेकून देतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नागपुरचा कांदा नासला आहे. तो इतर कांद्यांना नासवतोय या नासक्या कांद्यांला राजकारणातून बाहेर फेकून द्यावे लागेल. तरच राज्यातील राजकीय परिस्थिती व्यवस्थित राहील. असा टोला सुरज चव्हाण यांनी लगावला आहे.
माझी निष्ठा फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी”; ऋतुजा लटकेंनी विरोधकांना सुनावलं खडेबोल
दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि राष्ट्रवादीचा पहाटेचा शपथविधी गाजला होता. अवघ्या 24 तासातच ते सरकार कोसळलं. त्यानंतर राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेनामध्ये महाविकास आघाडी तयार होऊन उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. तशापासून आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची टांगती तलवार होती. यात अनेक नेते तुरूंगात गेले. त्यानंतर मग शिवसेनेत फुट पडून शिंदे -फडणवीस सरकार स्थापन झालं.
एक कांदा नासला की तो इतर कांद्यांना नासवतो इतर कांदे नासू नयेत म्हणून नासका कांदा फेकून देतात.सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नागपूरचा कांदा नासला आहे तो इतर कांद्यांना नासवतोय या नासक्या कांद्यांला राजकारणातून बाहेर फेकून दयावे लागेल.तरच राज्यातील राजकीय वातावरण व्यवस्थित राहील.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) October 11, 2022
Read also
- “शिंदे सरकार आल्यापासून राज्यपाल रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “अनिल परबांचा डाव ओळखावा..”! मनसेच्या आरोपामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट
- “लटकेंचा राजीनामा स्वीकाराला नाही तर…..ठाकरेंकडे आहेत हे तीन पर्याय”
- “पालिकेला ऋतुजा लटकेंनी दोनदा अर्ज केले”; शिंदे सरकारकडून विनाकारण अडवणुक ?
- “अण्णाभाऊ साठे सभागृहाचं काम लवकरात लवकर व्हावं”; भाजपची मुख्यमंत्र्यांकडे मागणी