मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना जामीन अर्ज मंजूर करण्यात यावा असं म्हणत उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना फटकारलं आहे. त्यामुळे आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना शिवसेनेकडून निवडणुक लढता येणार आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांना मंजूर झालेला राजीनामा द्या. असे आदेश देखील कोर्टोने दिले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी निवडणुकीआधी मैदान जिंकला आहे.
“अनिल परबांचा डाव ओळखावा..”! मनसेच्या आरोपामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट
राजीनामा अर्ज सादर केल्यानंतरही महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर न केल्याने ठाकरे गटाने कोर्टात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी करत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे आता मशाल विरूद्ध कमळ की मशाल विरूद्ध ढाल तलवार अशी रंगत लढणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी उद्या म्हणजे 14 ऑक्टोबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची तारिख आहे.
“लटकेंचा राजीनामा स्वीकाराला नाही तर…..ठाकरेंकडे आहेत हे तीन पर्याय”
दसरा मेळाव्यानंतर शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हायकोर्टोने शिंदे गटाचा निर्णय हाणून पाडला होता. आता पोटनिवडणुकीसाठी राजीनाम्याची अडवणुक करण्याच्या प्रयत्नावर फटकार गेल्या महिनाभरात हायकोर्टोतल्या दोन घडामोडी ठाकरेंच्या बाजूने झाल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
“पालिकेला ऋतुजा लटकेंनी दोनदा अर्ज केले”; शिंदे सरकारकडून विनाकारण अडवणुक ?
यातच काॅग्रेसने यावर आता हल्लाबोल केला आहे. इज्जत बुंद से गयी वो हौद से नहीं आती. असे बिरबल अकबरला म्हणाला होता. इथे तर भाजपची हौदा हौदाने चालली आहे. शांतपणे ऋतुजा लटके यांना पाठिंबा देऊन निवडणुक बिनविरोध करा. असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. वक्त रहते संभल जाओ वरना वक्त तुम्हैं संभाल ही लेगा बस वक्त का मंजर दर्दनाक होगा, असं म्हणत काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी टोला हाणला आहे.
Read also
- शिवसेनेने अनेक वादळे अंगावर घेतलेत, हिमंत असेल तर मैदानात या..! उद्धव ठाकरेंचा एल्गार
- “जर छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती, तर ते मुख्यमंत्री झाले असते”; उद्धव ठाकरे
- “नागपुरचा नासका कांदा बाहेर फेकला पाहिजे, तरच राज्याची राजकीय परिस्थिती सुधारेल”; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला
- “नागपुरचा नासका कांदा बाहेर फेकला पाहिजे, तरच राज्याची राजकीय परिस्थिती सुधारेल”; राष्ट्रवादीचा फडणवीसांना टोला
- “शिंदे सरकार आल्यापासून राज्यपाल रिटायर्ड झाल्यासारखे वाटतात”; राष्ट्रवादीने डिवचलं