ठाकरे गटाची संपत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याबाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती. शिवसेना भवनासह पक्षाचा निधी आणि शिवसेना शाखांचा ताबा शिंदे गटाला देण्याबाबत ही याचिका दाखल करण्यात आली होती. एका वकिलाने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेशी शिंदे गटाचा काहीही संबंध नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच याचिका करणाऱ्या वकिलालाही सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं आहे.
हेही वाचा…पुण्यात शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजपात प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ
अॅड. आशिष गिरी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत उद्धव ठाकरे गटाकडे असलेलं शिवसेना भवन, शिवसेनेचा निधी आणि शिवसेनेच्या शाखांचा ताबा शिंदे गटाकडे देण्याची मागणी केली होती. गिरी यांच्या या याचिकेने सर्वांची झोप उडाली होती. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतल्यानंतर कोर्ट त्यावर काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र कोर्टाने ही याचिका फेटाळूनच लावली नाही तर या वकिलाला खडेबोलही सुनावले आहेत.
हेही वाचा… ‘मविआ’त फूट; काँग्रेस, राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला मोठा धक्का
शिवसेना पक्षाच्या मालमत्ते बाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाला पक्षाची संपत्ती द्यायची की नाही याबाबत ही सुनावणी होती. यावेळी कोर्टाने याचिकाकर्त्या वकिलाची याचिका फेटाळून लावत दणका दिला. तसेच संपत्ती शिंदेंना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखांचा ताबा ठाकरे गटाकडेच राहणार आहे. तसेच शिवसेनेचा निधीही ठाकरे गटाकडेच राहणार आहे.
Read also
हेही वाचा… अजितदादा सोबत येणार असतील तर…, शिवसेनेने घातली मोठी अट!
हेही वाचा… “..तेव्हा उद्धव ठाकरेंनी आमदारांना जाऊ दिलं”; दानवेंचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरेंची ठाकरे गटातून हकालपट्टी
हेही वाचा… मोठा गौप्यस्फोट, शरद पवार यांच्या सांगण्यावरून संजय राऊत अजितदादा यांचा गेम करणार..!