मुंबई : धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्ह्यांतील ३३ पंचायत समित्या आणि ५ जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर झाला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार १९ जुलैला मतदान होणार आहे, तर २० जुलैला मतमोजणी होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली आहे.
दरम्यान, यानंतर विरोधकांनी आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली असून, “या सरकारमध्ये ओबीसींविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबतीत राज्य सरकारची २ महिने वाट पाहिली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. या सरकारमधले ओबीसींचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी, जोवर आरक्षण मिळत नाही, तोवर निवडणुका लावू देणारा नाही, असं सांगितलं होतं. मात्र, आता हे स्पष्ट झालं आहे, की या सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं चालत नाही. आता या निवडणूक होत असल्यामुळे ओबीसी समाजाचं मोठं नुकसान आहे. त्यामुळे आतातरी राज्य सरकारने तत्परतेने सर्वोच्च न्यायालयात जावं आणि या निवडणुका रद्द करण्याबाद्दल याचिका दाखल करावी,’ असं मत त्यांनी मांडलं आहे.
हे पण वाचा, ओबीसी आरक्षण रद्द केलेल्या ५ जिल्हा परिषदा, ३३ पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
२९ जून २०२१ ते ५ जुलै २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी ६ जुलै २०२१ रोजी होईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे ९ जुलै २०२१ पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी १२ जुलै २०२१; तर अपील असलेल्या ठिकाणी १४ जुलै २०२१ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. १९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. २० जुलै २०२१ रोजी मतमोजणी होईल, असेही मदान यांनी सांगितले.
Read Also :
- जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणूकांविरोधात न्यायालयात जाणार – पंकजा मुंडे
- ओबीसी समाजावरील अन्याय थांबवून निवडणूका रद्द करा, अन्यथा….; फडणवीस आक्रमक
- ओबीसी नेत्यांच्या घोषणा ठरल्या फोल; आता वडेट्टीवार, बावनकुळे काय करणार?
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकांची घोषणा हा तर ओबीसींवर घोर अन्याय; पंकजा मुंडे म्हणतात…
- “वडेट्टीवार-पटोले स्वतःला खरे ओबीसी नेते समजत असतील, तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे”