नागपूर : सहा जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फारशी चमक दाखविण्यात आलेली नाही.
धुळ्यात चंद्रकांत पाटलांच्या लेकीचा दणदणीत विजय; धरती देवरे यांच्या झेंडा फडकला
जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. अपवादात्मक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तर मनसे आणि भाजपचीही युती झाली होती. मात्र, एकंदरीत सर्वच ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपआपलं बळ दाखवलं होतं. जिल्हा परिषदेच्या 85 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 23 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवून आपणच राज्यात नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. तर काँग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17, शिवसेनेने 12 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविल आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 46, भाजपने 23 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविला आहे.
नागपूरात अनिल देशमुखांना जोर का झटका; नगरखेड पंचायत समितीत भाजपचे कमळ फुलले
अकोल्यात 14 जागांपैकी भाजप, काँग्रेस, शिवसेनेने प्रत्येकी एक, राष्ट्रवादीने दोन आणि इतरांनी 9 जागा जिंकल्या आहेत. धुळ्यात 15 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 8, काँग्रेस आणि शिवसेनेने प्रत्येकी दोन आणि राष्ट्रवादीने तीन जागांवर विजय मिळवला आहे. नंदूरबारमध्ये 11 जागांपैकी भाजपने 4, शिवसेना आणि काँग्रेसने प्रत्येकी 3 आणि राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे. नागपूरमध्ये मात्र भाजपला काहीसा धक्का बसला आहे. नागपूरच्या 16 जागांपैकी भाजपने 3, राष्ट्रवादीने 2, काँग्रेसने 9 आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेला खातंही खोलता आलं नाही. पालघरमध्ये 15 जागांपैकी शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच, राष्ट्रवादीला चार आणि इतरांना एका जागेवर विजय मिळाला आहे. पालघरमध्ये काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही. तर वाशिममध्ये 14 जागांपैकी भाज आणि काँग्रेसला प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीला 5, इतरांना 4 आणि शिवसेनेला एका जागेवर विजय मिळविता आला आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या मतमोजणीला सुरुवात; कुणाचा झेंडा फडकणार?
आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्रं राहिल्यास भाजपला कायमच सत्तेपासून दूर राहावं लागणार असल्याचं चित्रं आहे. त्यामुळे भाजपला सत्तेत जाण्यासाठी मनसेला सोबत घ्यावं लागणार आहे. त्याशिवाय भाजपला बेरजेचं राजकारण करता येणार नाही. तसेच सत्तेचा सोपानही चढता येणार नाही. मनसेशी युती ही आता भाजपची मजबुरी झाली आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.
जिल्हापरिषद एकूण 85 जागांचे निकाल
- भाजप- 23
- राष्ट्रवादी- 17
- शिवसेना-12
- काँग्रेस-17
- इतर- 16
Read Also :
- नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का: काँग्रेसला घवघवीत यश, राष्ट्रवादीला मात्र दोनच जागांवर मानावे लागले समाधान
- मंत्रीपद गेलं तेल लावतं, उद्याचं राजीनामा फेकून मारतो; बच्चू कडू संतापले
- संपूर्ण ड्रग्स प्रकरणच बनावट, कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही; राष्ट्रवादीच्या गौप्यस्फोटाने खळबळ
- अमोल मिटकरींना मोठा धक्का: गावातच झाला पराभव, बच्चू कडू यांच्या प्रहारचा फटका
- अकोल्यात वंचित बहुजन आघाडीची मुसंडी; भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी गेली कोमात