मुंबई : आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी, केंद्र सरकारने रासायनिक खतांचे वाढवलेले दर, तौक्ते चक्रीवादळामुळे पश्चिम किनारपट्टीच्या भागांत झालेले नुकसान देशातला लसीकरण कार्यक्रम आणि अशा अनेक मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले. यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी असायला हवे होते, असे विधान देखील केले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात लसींच्या वाढत्या मागणीवरुन दहा कंपन्यांना लसनिर्मितीची परवानगी देण्याचा सल्ला आपल्या सरकारला दिला आहे. यावरुन नाना पटोले यांनी, ‘देशात महामारीमुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, पंतप्रधान मोदींना याचं काही सोयरसुतक नाही. खरंतर देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी यांनी असायला हवं होतं. मात्र, मोदींसमोर नितीन गडकरींचं चालतं की नाही ठाऊक नाही’, असं विधान केलं आहे.
तसेच, ‘भाजपत मोदींना बाजूला काढून गडकरी यांना पंतप्रधानपद द्यावं अशी चर्चा सुरू आहे. असं असेल तर आम्हला आनंदच आहे, कारण महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी विराजमान होतोय. जेव्हा मी गडकरी यांच्याविरुद्ध लढलो, त्यावेळी गडकरींनी भावी पंतप्रधान यासाठी मतं मागितली होती,” असंही नाना पटोले म्हणाले आहेत.
Read Also :
- ‘महाराष्ट्राला गुजरातसारखी वागणूक मोदींकडून का दिली जात नाही?’ मालिकांचा सवाल
- मराठा आरक्षण.! संभाजीराजे आज करणार भूमिका जाहीर?
- लसीकरणात महाराष्ट्र अव्वल, पार केला 2 कोटींचा टप्पा
- ‘काँग्रेसने दोषारोपांच्या गलिच्छ राजकारणातून बाहेर येऊन…’, चंद्रकांत पाटलांचे कळकळीचे आवाहन
- ‘काँग्रेसकडून दरवेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?’