मुंबई : राज्यात गेल्या ६ महिन्यांपासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमुळे लवकरच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारची नाव गंटागळ्या खात बुडणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याच्या विधानसभागृहाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची अचानक भेट घेतल्याने राज्यात राजकीय चर्चांना तुफानी लाटांसारखे उधाण आले.
दरम्यान, त्यांच्या या भेटीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी, ‘पवारांनी त्यांना नक्कीच सत्तेचा मंत्र दिला असेल. सध्या विरोधी पक्ष ज्याप्रकारे राज्यात गोंधळ निर्माण करून, सरकारच्या कामात अडथळे तयार करत आहे, हे असंच सुरु राहिलं तर, पुढच्या १०० वर्षांतसुद्धा राज्यात भाजप सत्तेत येऊ शकणार नाही! हेच पवारांनी सांगितलं असेल,” अशी खोचक प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, जळगावातील वादळग्रस्त पिकांची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी, संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला असून, ‘राऊतांची अवस्था “ना घरका ना घाट का” अशी झाली आहे. ते चांगले संपादक आहेत, मात्र ते नेमके आहेत कुणाचे, आता तर ‘सामना’च्या मुख्य संपादक रश्मीताई ठाकरे आहेत. त्यामुळे ते स्वत:कडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत,’ अशी जोरदार टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
तसेच, ‘डॅमेज कंट्रोलची करण्याची गरज या सरकारला आहे. रोज होत असलेले आरोप, सरकारची झालेली अवस्था आणि नुकत्याच लागलेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल, या सगळ्यामुळे या सरकारला डॅमेज कंट्रोलची गरज आहे,’ असं ते म्हणाले.
Read Also :
- आम्हाला निवडणुकीची आणि पराभवाची भीती नाही, ज्यांना असं वाटत असेल ती त्यांची पोटदुखी आहे
- ‘चंद्रकांत पाटलांचा तोल ढळला आहे, त्यांना…’ शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांची खरमरीत टीका
- कटकमिशनचे धंदे बंद करा! मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवरुन भाजपने केले शिवसेनेवर ४ गंभीर आरोप
- जळगांवात शिवसैनिकांनी अडवला देवेंद्र फडणवीसांचा ताफा… नंतर काय घडले
- ‘आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघा! म्हणूनसुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधांनाना पत्र लिहितील’