मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आपली नाराजी व्यक्त करत आहेत. यासंदर्भात पक्षातील वरिष्ठांकडे देखील खडसेंनी न्याय मागितला मात्र एकनाथ खडसे यांचे समाधान होऊ शकले नाही.
त्यामुळे एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील हे स्वतः जळगावला येणार होते आणि यासंबंधी चर्चा करणार होते मात्र जयंत पाटील यांचा जळगावचा दौरा रद्द झाला आहे.मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः यासंबंधी बैठक घेणार आहेत.
त्यामुळे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतील तर जळगाव जिल्ह्यातील पक्षीय राजकारणात याचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत शरद पवारांच्या बैठकीत खलबतं होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीही एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ती केवळ चर्चा होती. त्यांनी भाजपातच राहणे पसंत केले, परंतु एकनाथ खडसेंनी आता पक्षातील विरोधकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे.
खडसेंच्या पक्ष प्रेवेशबाबत शरद पवार कार्यकर्त्यांशी बोलणार
जयंत पाटील यांचा दौरा रद्द झाल्यामुळे राष्ट्रवादीचे अद्यक्ष शरद पवार यांच्याकडून पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हयातील सिंचन प्रश्न, केळी पिकाच्या संदर्भातील पश्न, या विषयावरही चर्चा यावेळी करण्यात येणार आहे.या वेळी एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशावर चर्चा होण्याची शक्यता आहे वर्तवली जात आहे.
Read Also
अमोल कोल्हे यांना मराठा समाजाचे नुकसान करायचे आहे का ? माजी आमदार योगेश टिळेकर यांचा सवालhttps://t.co/yElcgcHY8v#AmolKolhe #YogeshTilekar #MarathaReservation@kolhe_amol @iYogeshTilekar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 23, 2020