मुंबई : ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून टार्गेट करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्व आणि ममत्व काय असणार?, अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. राममंदिर वर्गणीतून उभारण्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यानंतर आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे.
ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी रामवर्गणीला अग्रलेखातून टार्गेट करावे हे स्वाभाविकच. ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्व आणि ममत्व काय असणार???
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
ज्यांच्या पक्षाचा पिंड खंडणी आणि टक्केवारीवर पोसलाय त्यांना रामवर्गणीचे महत्त्व आणि ममत्व काय असणार? ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते, अशी बोचरी टीका भातखळकरांनी शिवसेनेवर केली आहे.
ज्यांच्या ताटात अबूची बिर्याणी, इटालियन मातोश्रींचा पिझ्झा आणि धोरणी साहेबांची वांगी आहेत, त्या नव ब्रिगेडी बाटग्याना राम वर्गणीच्या नावाने करपट ढेकर आले नसते तरच आश्चर्य होते…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 21, 2020
देशातील रामभक्तांच्या सहकार्याने भव्य राम मंदीर उभे राहीलच, तुम्हाला त्याची चिंता नको. तुम्ही अजान स्पर्धाची काळजी करा, असा जोरदार टोला देखील त्यांनी लगावला.
दरम्यान, राम मंदिर हे लोक वर्गणीतून उभारले जाणार आहे. यावर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. चार लाख स्वयंसेवक हे मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड 2024चा निवडणूक प्रचार आहे. रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा, असे शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखात म्हटले होते.