काल सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे सोपवल्यानंतर राज्याच्याच नाही तर देशातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सुशांत प्रकरणाचा सीबीआय तपास डॉ. दाभोलकर हत्या चौकशीप्रमाणे होऊ नये, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. मात्र पवारांच्या या खोचक विधानाला भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. शरद पवारजी जर तुम्ही आपल्या कवडीमोल किंमत नसलेल्या नातवाचे ऐकले असते तर आज तुमच्यावर अशी खोटं बोलण्याची वेळ आली नसती असा टोला भातखळकर यांनी पवारांना लगावला आहे.
काय म्हणालेत अतुल भातखळकर नेमकं
नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर राज्यात तब्बल १४ महिने तुमचेच सरकार होते आणि तुमच्याच पक्षाचा गृहमंत्री होता.
या १४ महिन्याच्या काळात पुरावे नष्ट करण्याचे काम झाले असे देखील सीबीआयचे म्हणणे आहे.
त्यामुळे शरद पवारजी जर आपण आपल्या कवडीमोल किंमत नसलेल्या नातवाच ऐकलं असत तर असं खोचक पद्धतीने खोट बोलण्याची वेळ आपल्यावर आली नसती.
आता सीबीआय नक्कीच या प्रकरणाचा तपास लावेल अशी जनतेला खात्री आहे.
व्हिडीओ
सुशांत सिंहचे प्रकरण नरेंद्र दाभोळकरांसारखे होणार नाही अशी खोचक टिप्पणी करणाऱ्या @PawarSpeaks यांना या हत्येनंतर 14 महिने राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार असल्याचा विसर पडलेला दिसतो. मग का तपास झाला नाही? जे आता पोलीस करतायत त्यावेळीही तसच झालं होतं का याची उत्तरही त्यांनी द्यावी. pic.twitter.com/dhaTRR4k6J
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 20, 2020
काय म्हणाले होते शरद पवार नेमकं
सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल.
मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.
मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी #CBI मार्फत २०१४ मध्ये सुरू झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 20, 2020