मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष म्हटले आहेत. यावरून आता भाजप नेते राम कदम यांनी टीका करताना ‘शिवसेनेला वचन पळणारा मित्र म्हणणे ही पवारांची राजकीय हतबलता’, असल्याचे म्हटले आहे.
शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. हे सरकार किती दिवस टिकेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. पण हे सरकार पाच वर्ष टिकेलच, पण त्यापुढे लोकसभा आणि विधानसभेलाही चांगली कामगिरी करेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला होता. यावरून राम कदम यांनी टीका केली आहे.
राम कदम म्हणाले की, शरद पवार यांना शिवसेना हा वचन पळणारा मित्र आहे, असे म्हणावे लागले ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राजकिय हतबलता आहे. तसेच ही शरद पवारांची राजकीय अडचण आहे. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचे वचन पाळू शकले नाही तो वचन पाळणारा पक्ष कोणत्या आधारावर आहे ? अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, याआधी भाजप नेते अतुल भातखळकर यांनी देखील यावरून पवारांवर निशाणा साधला होता. विश्वासघात हाच ज्यांच्या राजकारणाचा मूलमंत्र राहिला ते शिवसेनेवर लोकांचा विश्वास असल्याचे सांगतायत. खरंतर या दोन्ही पक्षांनी खंजीर हे निवडणूक चिन्ह ठेवायला काय हरकत आहे?, असा टोला त्यांनी लगावला होता.
Read Also :
- वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंपाठोपाठ आता आदित्य ठाकरेंनीही केले ‘हे’ आवाहन
- कोरोनारुग्ण आणि मृतांची आकडेवारी लपवली जात आहे ? आरोग्य विभाग म्हणाले…
- 12 वीच्या परीक्षांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख लवकरच जाहीर करणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती
- ‘वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचे राज्य’
- ‘शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’