मुंबई : राज्यातील दहावीच्या परीक्षांपाठोपाठ बारावीची परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या परीक्षा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
कोरोनाचा वाढता संसर्ग व त्यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला उद्भवणारा धोका लक्षात घेता २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील इ. १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याबाबतचे शासकीय आदेश आज काढण्यात आले. (१/२) pic.twitter.com/iSKFeHMqtC
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) June 11, 2021
सर्व विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्यात येणार आहे. 12 वीच्या परीक्षांचे मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
सर्व संबंधित घटकांशी केलेल्या चर्चेअंती सध्याचे वातावरण परीक्षेसाठी पोषक नसल्याने परीक्षा रद्द करून पर्यायी मूल्यमापनाच्या आधारे निकाल घोषित करावा, असे महाराष्ट्र शासनाने केंद्राला यापूर्वीच सुचवले होते, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
Read Also :
- ‘वाघ हा वाघ असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर वाघाचे राज्य’
- ‘शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षात ठेवा’
- ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, पण आम्ही भिकारी आहोत का?’
- ‘हमीभावात केलेली वाढ हा केंद्र सरकारचा जुमला’
- ‘शिवसेना-राष्ट्रवादीने ‘खंजीर’ हे निवडणूक चिन्ह ठेवायला हवे’