अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मराठा आरक्षण तर दुसरीकडे पदोन्नतीमधील मागासवर्गीयांचे आरक्षण या मुद्यावरून विरोध आक्रमक झाले असतानाच सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने देखील आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
पदोन्नतीमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस सातत्याने सरकारविरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. आता काँग्रेस नेते आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. पण आम्ही अजूनही हातात बांगड्या घातलेल्या नाही. आम्ही काय भिकारी आहोत का?, असा सवाल केला आहे.
नितीन राऊत म्हणाले की, आम्ही जे संविधानात्मक आहे जे भारतीय राज्यघटनेने दिले आहे, तेच आम्ही मागतो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यांना विरोध नाही. मात्र त्यांनीसुद्धा मोठेपणा दाखवून आम्हाला वेठीस धरू नये. म्ही अजून हातात बांगड्या घातलेल्या नाही. आम्ही भिकारी नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, 7 मे रोजी राज्य सरकारने 100 टक्के पदोन्नती सेवाज्येष्ठतेनुसार करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काँग्रेसने विरोध केला होता. अध्यादेश पारित करताना याबाबत काँग्रेसला विचारणा केल नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते.
Read Also :