अमरावती : राज्य सरकारनं दिलेली मदत कोणत्याही शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही पोहचली नसल्याचा आरोप देखील भाजपनं केला. राज्य सरकारनं शेतकऱ्यांची थट्टा चालविली असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असल्यानं भाजप शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मैदानात असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यामुळे 13 नोव्हेंबरपर्यंत सरकारनं मदत न दिल्यास पिठलं-भाकरी आंदोलन करणार असल्याचे या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं आहे.
अतिवृष्टीनं हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 10 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, ही मदत तोकडी असल्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये राज्य सरकारनं मदत करावी अन्यथा राज्यभरात सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता ‘पिठलं भाकर’ (चून भाकर )आंदोलन करणार, असा इशारा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे व भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांनी दिला आहे. अमरावतीत झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे आणि अनिल बोंडे यांनी आपल्या आंदोलनाबाबत माहिती दिली.
Read Also :
मुख्यमंत्रीपद मिळाल्यास नितीश कुमारांनी त्याचं श्रेय शिवसेनेला द्यावं : संजय राऊत
काय बोलताय? अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांची ‘नात’ नागपूरकर?
फक्त ‘या’ कारणामुळे आम्ही मुख्यमंत्री नितीश कुमारांना झटका दिला: चिराग पासवान
स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन…”, राणेंची टीका
…म्हणून जयंत पाटलांनी ‘तेजस्वी यादवां’वर उधळली स्तुतिसुमने
आता मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, भाजप आमदार आशिष शेलारांचे संकेत