नवी दिल्ली : 29 जानेवारीपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. देशाच्या अर्थकारणासाठी, तसेच भविष्यासाठी हे अधिवेशन महत्त्वाचे आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण, कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक क्षेत्रात मंदीचे सावट आहे, तसेच बेरोजगारी देखील प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे सरकार कोणत्या महत्त्वाच्या घोषणा करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आज (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बहुप्रतिक्षित असा यंदाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याशिवाय या दशकातील हे पहिलेच बजेट आहे.
कोरोना संकटावर मात करण्यासोबत देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारणी देण्यासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे गुंतवणुकदांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांचेच लक्ष्य या अर्थसंकल्पाकडे आहे. आरोग्यक्षेत्रातील पायाभूत सेवा-सुविधांसाठी तरतूद, बँकिंग क्षेत्रात सुधारणा आणि मागणीला चालना देण्यासाठी उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनादरम्यान, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी प्राधिकरण सुधारणा, वीज वितरण क्षेत्र परवानामुक्त करणारे, , नवीन वित्तीय विकास संस्था, भारतीय स्पर्धा आयोग सुधारणा, खासगी आभासी चलनावरील बंदी अशी विविध विषयांवरील अनेक विधेयके सादर केली जाणार आहेत.
दरम्यान, यंदाच्या वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन भागांमध्ये पार पडणार आहे. ज्यापैकी पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार आहे. तर, दुसरा टप्पा 8 मार्च ते 8 एप्रिल या काळात पार पडणार आहे.
Read Also :
- विधान परिषदेत पॉर्न पाहताना आढळला काँग्रेस आमदार ? स्पष्टीकरण देताना म्हणाला…
- ‘हायवेवर शिवसैनिकांनी काढली बंदूक, आणि…’, गृहमंत्र्यांपर्यंत पोहचलं प्रकरण
- ‘संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा’
- ‘राहुल गांधी लोकांना हिंसेसाठी प्रवृत्त करत आहेत’, स्मृती इराणींचे जोरदार प्रत्युत्तर
- शेतकरी आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न, राजू शेट्टींचा गंभीर आरोप