मुंबई: पुजा चव्हाण आत्महत्या प्रकारणात पुणे पोलिंसामोर तिच्या आईवडिलांनी जबाब नोंदवला आहे. आमचा कोणावरही आरोप नाही, तिच्या मृत्यूनंतर या विषायाला राजकीय वळण मिळाले होते. त्यानंतर जे काही घडले तो राजकीय नाट्या होते. असा जबाब त्यांनी वानवडी पोलिसांकडे दिला आहे.
हे पण वाचा: संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील केल्यास, मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार’; उमा खापरेंचा इशारा
शिवसनेचे आमदार संजय राठोडमुळेच पुजा चव्हाण हीने आत्महत्या केलाचा आरोप करण्यात आला होता, त्यानंतर संजय राठोड यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता.
हे पण वाचा: संजय राठोड यांचं होणार पुनर्वसन? मंत्री मंडळातल्या प्रवेशाबद्दल म्हणाले…
पुजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. ७ फेब्रुवारीला रात्री दीडच्या सुमारास तिने आत्महत्या केली. त्यांनर याप्रकरणाल एक वेगळेच वळण मिळाले, शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरल्याने अखेर संजय राठोड यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.
हे पण वाचा: उदय सामंत म्हणाले, “संजय राठोड हे लवकरच मंत्रिमंडळात सामील होणार”
पुजाने आत्महत्या केल्यानंतर काही दिवसांनी वानवडी पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. त्यां अंतर्गत वानवडी पोलिसांनी काही दिवसापूर्वी पूजा चव्हाणच्या आई वडिलांचा जबाब नोंदवून घेतला आहे. याबाबत वानवडी पोलिसांनी देखील दुजोरा दिली आहे. तिच्या आई वडिलांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवला. त्यात त्यांनी पुजाच्या आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरलेले नाही.
हे पण वाचा: संजय राठोड, अनिल देशमुख, अनिल परब आणि आता अजून एक? आघाडी सरकारला ग्रहण!
मंत्री मंडळात कमबॅक होण्याची शक्यता?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड, हे पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आले आहेत. मात्र, यावेळी उदय सामंत यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे. संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले होते. यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून संन्यास घेतल्यासारखेच होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांचे मंत्री मंडळात कमबॅक होण्याची शक्यता आहे.