यवतमाळ : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेले शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड, हे पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आले आहेत. मात्र, यावेळी उदय सामंत यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे.
सुप्रिया सुळेंनी उचलली स्वप्निलच्या बहिणीच्या शिक्षणाची आणि नोकरीची जबाबदारी!
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड आणि महाविकास आघाडी सरकार चांगलेच अडचणीत आले होते. यानंतर काही काळ संजय राठोड राजकीय वर्तुळातून संन्यास घेतल्यासारखेच होते. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांचे मंत्री मंडळात कमबॅक होण्याची शक्यता आहे.
“मी ईडीला भीक घालत नाही”, भास्कर जाधवांनी फोडली डरकाळी
“संजय राठोड यांची कार्यपद्धती धडाक्याची आहे. अशा लोकांची सध्या गरज आहे. त्यामुळे, लवकरच ते मंत्रिमंडळात सामील होणार,” असा विश्वास त्यांनी, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा दौऱ्यादरम्यान माध्यमांशी साधलेल्या संवादात केला आहे.
पुण्याच्या दिशा समितीचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार?
दरम्यान, “अतिशय गरीब आणि हलाखीच्या परिस्थितीतून कष्ट करून, मी इथपर्यंत पोहोचलो, पण राज्यातल्या घाणेरड्या राजकारणामुळे मला, माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला हे खूप दुर्दैवी आहे,” असं मत राजीनाम्यानंतर त्यांनी व्यक्त केलं होतं.
Read Also :
- “केंद्राचे तिन्ही कृषी कायदे, ठाकरे सरकारने जसेच्या तसे लागू करावेत”
- भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!
- जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिलेल्या, बँकेला ईडीने बजावली नोटीस
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर, नाना पटोलेंचा आक्षेप; दाखल केलेल्या याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी
- “…तर राज्य सरकार विरोधात पुन्हा तीव्र मूक आंदोलन सुरु करावे लागले”