नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर, आता ६ ऑगस्टपासून प्रत्यक्षात सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षकारांच्या विनंतीवरून ही तारीख ठरवली असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी, हे आदेश दिले आहेत.
“…तर राज्य सरकार विरोधात पुन्हा तीव्र मूक आंदोलन सुरु करावे लागले”
नितीन गडकरी २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत, नागपूर मतदारसंघातून विजयी झाले. मात्र, त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात, उत्पन्नाची खरी माहिती दिली नसल्याचा आणि उत्पन्न लपवून ठेवले असल्याचा आरोप पटोले यांनी याचिकेतून केला आहे. प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात, गडकरींकडे शेती नाही, त्यांनी त्यांच्या वडिलांचे नावही चुकीच्या पद्धतीने लिहिले आहे, असाही आरोप केला गेला आहे.
पुण्याच्या दिशा समितीचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार?
तसेच, या प्रतिज्ञापत्रात अनेक त्रुटी असतानाही, निवडणूक अधिकाऱ्याने त्यांचा अर्ज स्वीकारला आहे. निवडणूक कायद्यातील अनेक तरतुदी आणि नियमांचे पालन केले गेले नाहीये. त्यामुळे, त्यांची निवड रद्द करून, नागपूर मतदारसंघात पुन्हा नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे पराभूत उमेदवार असलेल्या पटोलेंनी केली आहे.
शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये – भास्कर जाधव
दुसरीकडे, गडकरींनी या याचिकेतील अनावश्यक व आधारहीन मुद्दे निकाली काढण्यासाठी, दिवाणी प्रक्रिया संहितेतील, सहाव्या ऑर्डरमधील, नियम १६ अंतर्गत आणि ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्यासाठी, दिवाणी प्रक्रिया संहितेतील, सातव्या ऑर्डरमधील, नियम ११ (अ) अंतर्गत अर्ज दाखल केले आहेत. न्यायालयाने हे अर्जदेखील पुढील सुनावणीत विचारात घेतले जातील, असे सांगितले आहे.
शिवीगाळ कोणी केली ते योग्य वेळी उघड करेन; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीनंतर गडकरी यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात, ३ याचिका दाखल झाल्या होत्या. त्यापैकी नाना पटोले व मतदार मो. नफिस खान यां दोघांच्या याचिका प्रलंबित आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
Read Also :
- सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच महाविकास आघाडी; संजय राऊत यांचे सुचक विधान
- सामनात आमच्याबद्दल कधी चांगलं लिहिलं गेलंय? ते काय आमचे हितचिंतक आहेत?’ फडणवीसाची राऊतांवर टीका
- केंद्रासह भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ट्वीटरवर कारवाई; नवाब मलिक यांची टीका
- फोन टॅपिंग प्रकरण: राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन, गृह खात्याचा निर्णय
- देशात समान नागरी कायद्याची गरज न्यायालयाने केली मागणी, केंद्राने पावले उचलावीत