पुणे: सामनामध्ये आमच्याबद्दल चांगलं कधी काही लिहिलं गेलं आहे का? चांगलं लिहायला ते काय आमचे हितचिंतक आहेत का? असा प्रश्न विचारत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तसंच संजय राऊत बोलतात म्हणजे त्यांना सगळं कळतं असं नाही, ते काही सर्वज्ञ नाहीत असाही टोला फडणवीस यांनी लगावला. भागवत कराडांना मंत्रिपद दिलं त्याबद्दल पंकजा ताईंना आनंदच झाला असणार. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
हे पण वाचा: केंद्रासह भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ट्वीटरवर कारवाई; नवाब मलिक यांची टीका
हे पण वाचा: फोन टॅपिंग प्रकरण: राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समिती स्थापन, गृह खात्याचा निर्णय
देशात सर्वात मोठा बसेसचा ताफा उपलब्ध करून देणारी पुणे महापालिका झाली आहे त्याचा आम्हाला आनंद आहे असंही देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. राज्यात सत्तारूढ पक्षाच्या वतीने एकतर्फी कारभार चालवला गेला. कपोलकल्पित आरोप लावून आमच्या बारा आमदारांना निलंबित करण्यात आलं. ओबीसींच्या प्रश्नावर आम्ही सरकारला उघडं पाडलं म्हणून त्यांनी आमचे आमदार निलंबित केले असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हे पण वाचा: देशात समान नागरी कायद्याची गरज न्यायालयाने केली मागणी, केंद्राने पावले उचलावीत
हे पण वाचा: ‘’जो वेळ मिळाला आहे तो वेळ ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी उपयुक्त करावा’’ – पंकजा मुंडे
विचारवंत हरी नरके यांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता, ते विचारवंत आहे त्यांच्या ओबीसींचं प्रवक्तेपद घेतलं पाहिजे मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकशाहीला फासावर चढवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर महाविकास आघाडी सरकारने केलं आहे. ओबीसींची इम्पेरिकल डेटा महाविकास आघाडी सरकारला देणे शक्य होतं पण त्यांनी तो दिला नाही वेळकाढूपणा केला त्यामुळे ओबीसींचं आरक्षण रद्द झालं.
दिल्लीतील इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाला
नाना पटोले यांनी भाजपवर केलेल्या टीकेबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता काँग्रेसच्या राज्यातल्या आणि दिल्लीतल्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाला आहे असा टोला त्यांनी लगावला. एखाद्या मंत्र्याने त्याच्या बायकोला मारलं तरी केंद्राने मारलं असं राज्यातले नेते सांगतात. १०८ रूपये प्रति लिटरमधले ४२ रूपये हे राज्य सरकारला जातात ते त्यांनी कमी करावेत म्हणजे पेट्रोलचे दर कमी होतील. गुजरातमध्ये पेट्रोलचा दर ९० रूपये प्रति लिटर आहे असंही त्यांनी ऐकवलं. कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. यानंतर मुंबईची लोकल सुरू झाली पाहिजे का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की मुंबईतली लोकल सेवा सुरू झाली पाहिजे असं मला मनापासून वाटतं पण तुम्ही प्रश्न चुकीच्या माणसाला विचारला आहे.