मुंबई: २०१५ ते २०१९ या काळात आपले फोन टॅप केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही नाना पटोले यांनी आपला फोन अनिष्ट राजकीय हेतून गैरपद्धतीने टॅप केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. केवळ आपलाच नाही तर इतर राजकीय नेत्यांचेही फोन टॅप केले असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तसेच चौकशीची मागणी केली होती.
हे पण वाचा: देशात समान नागरी कायद्याची गरज न्यायालयाने केली मागणी, केंद्राने पावले उचलावीत
हे पण वाचा: “डबे कितीही बदललेले तरी काही उपयोग नाही, इंजिन बदलणे गरजेच आहे”
नाना पटोले यांनी केलेल्या या चौकशीच्या मागणीची दखल घेत गृहमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचं जाहीर केलं आहे. तसेच या चौकशीत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. याबाबतची सर्व वस्तुस्थिती पुढील अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचंही म्हटलं आहे.
हे पण वाचा: बार मालकांसाठी चंद्रपुरात ठाकरे सरकार बनले देव, अतुल भातखळकर यांची खोचक टीका
हे पण वाचा: मोठी बातमी! निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारला दिलासा!
या फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती कठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष राज्याचे पोलीस महासंचालक असतील तर राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे आयुक्त आणि मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त हे दोन समितीचे सदस्य असणार आहेत.
हे पण वाचा: सहकार मंत्रालय सुरु करण्यामागचा यांचा नेमका हेतू काय? अजित पवारांनी मांडली रोखठोक भूमिका; वाचा सविस्तर
२०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणांची पडताळणी करुन उपरोक्त कालावधीत अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या काळात राज्यात भाजपची सत्ता होती आणि गृहमंत्रिपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचं बोललं जात आहे.