पुणे : केंद्रीय मंत्रिमंडळाचा, पहिला विस्तार झाला. त्याची चर्चा अजूनही देशात सुरु आहे. यामध्ये ४३ नव्या आणि अनुभवी चेहऱ्यांचा समावेश केला गेला असून, काहींना बढती मिळाली आहे, तर जुन्या १२ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला गेला आहे. दरम्यान, केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि अमित शहा या नवीन खात्याचे पहिले ‘सहकार मंत्री’ बनले. या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, महामारीच्या आढावा बैठकीनंतर, आज प्रसार माध्यमांशी बोलताना, मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“डबे कितीही बदललेले तरी काही उपयोग नाही, इंजिन बदलणे गरजेच आहे”
सहकार मंत्रालय सुरु करण्यामागे त्यांचा हेतू काय, त्यामागे वेगवेगळे कंगोरे असू शकतात…
“केवळ ५५ आमदारांत मुख्यमंत्री झाला, पिंपरी-चिंचवडचा महापौर ५० नगरसेवकांत होणार नाही?”
“हे नवीन सहकार मंत्रालय सुरु करण्यामागे त्यांचा हेतू काय, त्यामागे वेगवेगळे कंगोरे असू शकतात. आता नियम बनवल्यानंतरच कळेल, यातून त्यांना काय साध्य करायचं आहे आणि साधायचं आहे. हा विभाग पूर्णपणे राज्याच्या अखत्यारितील विभाग आहे, राज्यानेच त्याबद्दल पाहावं. केंद्राच्या हातात, ज्या मल्टिस्टेट सोसायट्या, कारखाने, बँका असतात, त्याबद्दल केंद्राने पाहावं. ही सहकार चळवळ, सगळ्यात जास्त महाराष्ट्रात फोफावलेली आहे, रुजली आहे आणि वाढली आहे. नक्कीच या क्षेत्रात चुकीची लोकं आहेत. पण त्या मोजक्या चुकीच्या लोकांमुळे संपूर्ण क्षेत्रचं चुकीचं आहे, अशी समजूत करून घेण्याचं काहीच कारण नाही”, असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
“मुंडे साहेबांना तर शपथही…” आणि गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने, पंकजा मुंडे झाल्या भावुक
पुण्याचा बाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे, महामारीचे नियम तुम्ही गांभीर्याने घ्या!
लातूरमध्ये राष्ट्रवादीने, भाजप-काँग्रेसला दाखवली वेळ; लावले अनेक पदाधिरकारी गळाला
पुण्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. ज्या लोकांनी लसीचे २ डोस घेतले आहेत, म्हून ते मास्क घालत नाहीत; त्यांना मास्क लावायला सांगा. अशी माहिती समोर आली आहे; की दोन डोस घेऊनही महामारीने काही लोकं बाधित झाले आणि दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. त्यामुळे काहीही झालं तरीही मास्क हा घालावाचं लागेल! माझी राज्यातील आणि पुण्यातील नागरिकांना हीच विनंती आहे. पुण्याचा मृत्यूदर १.६% आहे, मात्र, आता तो वाढू लागला आहे,” असं त्यांनी सांगितलं.
आम्ही नाराज नाहीत, आमच्यावर मुंडे साहेबांचे संस्कार; पंकजा मुंडेंनी मौन सोडले
“निर्बंधानुसार ४ नंतर सगळं सरसकट बंद झालंच पाहिजे, आमच्याकडून पोलिसांना असे आदेश दिले गेले आहेत. पुण्याला ऑक्सिजन पुरवठा योग्य प्रमाणात होत आहे. पुढेही आता हेच निर्बंध कायम असणार आहेत, बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पुण्याने ५० लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे; पण २ दिवस लस नसल्याने, केंद्रं बंद आहेत. लस पुरवठा होईल, तसं लसीकरण सुरु राहील. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याने खबरदारी घ्या! मास्क लावा! नियम पाळा! बालहर फिरू नका!,” असे कळकळीचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.
काँग्रेसमध्ये राऊत-पटोले वाद उफाळला, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत थेट दिल्ली दरबारी दाखल
मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं, हा सर्वस्वी पंतप्रधानांचा अधिकार
पवारांना धक्का : देवेंद्र फडणवीसांनी एक पत्र लिहिले अन् राष्ट्रवादीच्या नेत्याची केली हकालपट्टी
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना, “कुणाला घ्यावं आणि कुणाला थांबवावं, हा सर्वस्वी पंतप्रधानांचा अधिकार आहे. यात आमच्यासारख्या बाहेरच्यांनी लुडबूड करण्याची काहीच गरज नाही. पंतप्रधानांकडे बघूनच हे सर्व लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत,” असं सांगताना त्यांनी, “भारती पवार आधी राष्ट्रवादीच्या होत्या. त्या आदिवासी समाजाच्या असून डॉक्टर आहेत, कपिल पाटील आधी राष्ट्रवादीचे होते, ते आग्री समाजाचे आहेत, राणेंना कोकणातील लोकांचा मोठा जनाधार आहे. ते देखील पूर्वी काँग्रेसचे होते, नंतर शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले, भागवत कराडही ओबीसी नेते आहेत,” असं दर्शविताना त्यांनी, भाजपने राजकीय हेतूने प्रेरित होऊन या नेत्यांची मंत्रीपदी निवड केली आहे, असं त्यांनी दर्शवलं आहे.
Read Also :
- मोठी बातमी! निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणूका पुढे ढकलल्या, ठाकरे सरकारला दिलासा!
- “मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडे यांनीच घडवलं, आम्ही दोघेही मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते”- फडणवीस
- पक्षात मी-मी चालत नाही, आधी राष्ट्र, पक्ष आणि शेवटी मी; ही भाजपची संस्कृती, पंकजाताईंचा रोख कुणाकडे?
- “मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील सर्वांना फडणवीसांनी संपवलं”, शिवसेनेची टीका
- अँटिलिया स्फोटकं-मनसुख हिरेन हत्या प्रकरण : घडामोडींना वेग, तळोजा जेलमध्ये होणार वाझेची चौकशी