पुणे: राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा निष्क्रीय कारभार भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून उघड केल्याने करोनाचे कारण पुढे करत महाविकास आघाडी सरकारने चर्चेला घाबरून दोन दिवसात राज्याचे विधीमंडळ अधिवेशन गुंडाळत लोकशाहीला कुलूप बंद करण्याचे काम केले आहे. तसेच हे अधिवेशन एकतर्फी चालवित भाजप आमदारा विरोधात शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केल्याचे आरोप करून आमच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, त्यावेळी आपणही सभागृहात होतो.
हे पण वाचा: देशात समान नागरी कायद्याची गरज न्यायालयाने केली मागणी, केंद्राने पावले उचलावीत
हे पण वाचा: केंद्रासह भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ट्वीटरवर कारवाई; नवाब मलिक यांची टीका
तसेच एक जबाबदार पक्षाचा प्रमुख म्हणून पीठासीन अध्यक्ष यांना कोणी शिवीगाळ केली हे योग्यवेळी मी उघड करेल, असा इशारा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिला.
हे पण वाचा: सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच महाविकास आघाडी; संजय राऊत यांचे सुचक विधान
फडणवीस म्हणाले की, राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यावर अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण होण्यास महाविकास आघाडीचे सरकारच जबाबदार आहे. आम्ही वारंवार शासनाने काय करावे याबाबत सांगत होतो. मात्र, आघाडी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत होते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आघाडी सरकारला उघडे पाडण्याचे काम आम्ही केले. या सर्व बाबींबर अधिवेशनात चर्चा होणे आवश्यक होते. मात्र, करोनाचे कारण पुढे करत सरकारने दोन दिवसात हे अधिवेशन गुंडाळले.
हे पण वाचा: रक्षा खडसेंचा मोदी सरकारला घरचा आहेर.! म्हणाल्या खताच्या किंमती…
हे पण वाचा: ‘’जो वेळ मिळाला आहे तो वेळ ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित करण्यासाठी उपयुक्त करावा’’ – पंकजा मुंडे
राज्यसरकारने एकतर्फी अधिवेशन चालवून आमचे आमदारां विरोधात कपाक्ल्पित आरोप करुन त्यांचे वर्षभरासाठी निलंबन केले. ओबीसी आरक्षणाचे मुद्द्यावरुन सत्तारुढ पक्ष उघड पडल्याने त्यांनी आमच्यावर खोटे आरोप करुन कारवाई केली. तसेच मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण तसेच धनगर आरक्षण न मिळण्यास महाविकास आघाडी सरकारच जबाबदार असल्याचे सांगत ही आरक्षणे मिळत नाहीत तो पर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच राहणार आहे.