कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर, राज्यात छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचे मूक आंदोलन राज्यात सुरू झाले. राज्यातल्या अनेक प्रमुख शहरांत हे आंदोलन केले गेले (जसे की कोल्हापूर, नाशिक).दरम्यान, त्यानंतर संभाजीराजेंनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारसमोर मराठा समाजाच्या हिताच्या आणि न्याय्य हक्काच्या दृष्टीने काही महत्वाच्या अश्या ६-७ मागण्या ठेवल्या. तसेच, त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ठाकरे सरकारला १ महिन्याची मुदत देण्यात आली.
केंद्रासह भाजपवर लोक उघडपणे बोलत असल्याने ट्वीटरवर कारवाई; नवाब मलिक यांची टीका
मात्र, आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी, “आम्ही सरकारसमोर ठेवलेल्या ६ मागण्यांबाबत, राज्य सरकारकडून काहीच ठोस असा निर्णय घेतला गेला नाहीये. हालचाली नक्कीच होत आहेत, काही मागण्यांवर सरकार सकारात्मक पावलं उचलत आहे. मात्र, बाकीच्या मागण्यांबाबत सरकार उदासीनता दाखवत आहे, चालढकल केली जात आहे,” असा आरोप ठाकरे सरकारवर केला आहे.
सामनात आमच्याबद्दल कधी चांगलं लिहिलं गेलंय? ते काय आमचे हितचिंतक आहेत?’ फडणवीसाची राऊतांवर टीका
तसेच, “MPSC च्या २१८५ तरुणांच्या मुलाखतींबाबत शक्य असेक तितक्या लवकर, योग्य तो निर्णय घ्यावा, अशी हात जोडून विनंती, आमच्यकडून पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना, पुन्हा एकदा फोन करून केली जाणार आहे. तसेच, सारथी संस्थेला जो काही निधी द्यायचा आहे, तो राज्य शासनाने तत्काळ द्यावा, “अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी, “ओरडून दंगा करून काय उपयोग ? कधी आवाज वाढवायचा, हे मला कळतं आणि माझा जन्म छत्रपती घराण्यात झाला आहे, म्हणूनच सारखी तलवार काढून चालणार नाही,” असं सांगत अजूनही आम्ही हा लढा संयमाने लढणार आहोत अशी ग्वाही दिली.
पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदी लक्ष्मीनारायण मिश्रांची नियुक्ती
त्यामुळे, हे आंदोलन मूक असले, तरीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचेच यातून दिसून येत आहे. “सारथी सोडून इतर कोणत्याच मराठा समाजाच्या मागण्यांवर, राज्य सरकारच्या पातळीवर हालचाली होताना दिसत नाहीयेत, या मागण्या दिलेल्या वेळेत पूर्ण झाल्या नाहीत, तर आम्ही पुन्हा तीव्र मूक आंदोलन करू, असा इशारा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत दिला.
Read Also :
- पुण्याच्या दिशा समितीचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार?
- शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये – भास्कर जाधव
- शिवीगाळ कोणी केली ते योग्य वेळी उघड करेन; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- कोल्हापूर जिल्हा परिषद: युवराज पाटलांना दिलेला शब्द पाळणार का मंत्री हसन मुश्रीफ?
- सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच महाविकास आघाडी; संजय राऊत यांचे सुचक विधान