चिपळूण : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने केंद्रातल्या भाजप सरकारवर, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून, राज्यातील सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे लोकशाहीला धोकादायक आहे, असा आरोप केला जात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी लावून धरला होता.
भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते बैलगाडीतून कोसळले; आंदोलनातच घडला प्रकार!
दरम्यान, या पावसाळी अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी जसा भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालून सभागृह दणाणून सोडले, तसेच चर्चेत राहिले, ते तालिका अध्यक्ष भास्कर जाधव. आज त्यांनी सकाळी पत्रकार परिषदेत याच पार्श्वभूमीवर, भाजपवर दणाणून टीका केली आहे. यावेळी त्यांनी, “राज्यातील भाजपचे नेते केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांचा वापर करून, राज्यातील नेते आणि उद्योगपतींना संपवण्याचे काम करत आहेत. पण मी ईडीला भीक घालत नाही,” अशी डरकाळी फोडली आहे.
जरंडेश्वर कारखान्याला कर्ज दिलेल्या, बँकेला ईडीने बजावली नोटीस
“मुख्यमंत्र्यांनी मला अधिवेशनावेळी, तालिका समितीचे अध्यक्षपद स्विकारण्याची सूचना केली. त्यानुसार त्या पदाचा, सभागृहाचा आणि इतर सदस्यांचा मान राखण्याचे, सभागृहाचे नियम पाळले जातील आणि शिस्त अबाधित राहील, याला प्राधान्य देण्याचे मी ठरवले होते आणि आपली कामगिरी लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे, असा विचार मी केला होता,” असे त्यांनी सांगितले.
नितीन गडकरींच्या खासदारकीवर, नाना पटोलेंचा आक्षेप; दाखल केलेल्या याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी
तसेच, “मी दोन्हीकडच्या पक्षांना पुरेपूर संधीही दिली होती. आरक्षण विषयक प्रश्न आणि इतर विधेयक मंजूर होत असताना, विरोधी पक्षाला चर्चेत सहभागी होण्याची सूचना मी केली होती. मात्र, जे घडले त्यानंतर मला आक्रमक भूमिका घ्यावी लागली,” असे सांगत त्यांनी भाजप नेत्यांवर टीका आणि आपल्या निर्णयाचे समर्थन केले.
Read Also :
- “…तर राज्य सरकार विरोधात पुन्हा तीव्र मूक आंदोलन सुरु करावे लागले”
- पुण्याच्या दिशा समितीचे अध्यक्षपद कुणाकडे जाणार?, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष पेटणार?
- शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन विधानसभा अध्यक्षपद घेऊ नये – भास्कर जाधव
- शिवीगाळ कोणी केली ते योग्य वेळी उघड करेन; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
- सन्मानपूर्वक जागावाटप झाले तरच महाविकास आघाडी; संजय राऊत यांचे सुचक विधान