सातारा : महाराष्ट्र राज्य सहकार बँक कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी, ईडीने साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे राजेंद्र कुमार धाडगे हे जरंडेश्वर कारखाना चालवत होते. या साखर कारखान्याची त्या काळात अत्यंत कमी भावात विक्री करण्यात आली होती.
केंद्र सरकारकडून होणारी साखर उद्योगाची कोंडी अन् आर्थिक संकटात सापडलेले साखर कारखाने
यावर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने गुन्हा दाखल केला होता आणि आता ईडीकडून या कारखान्यावर टाच आणण्यात आली आहे.
जरंडेश्वर कारखाना: १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाची नोंद अन् शेतकरी आणि ऊस पुरवठादार चिंतेत
दरम्यान, या कारखान्यावर जप्तीची कारवाई केल्यानंतर, आता या कारखान्याला कर्ज दिलेल्या, सातारा जिल्हा बँकेलाही ईडीने २ दिवसांपूर्वी नोटीस बजावली आहे. यात कर्ज पुरवठा कशाच्या आधारावर केला?, त्याची परतफेड नियमित सुरु आहे का?, याबद्दलची सविस्तर माहिती ईडीने मागितली आहे. यावर, कारखान्याकडून सक्षम तारणावरच कर्जपुरवठा केला जात असून, त्यांचे कर्ज परतफेडीचे हप्ते वेळेवर येत आहे. त्यामुळे या नोटिशीला उत्तर देण्यात येईल,” असे जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले आहे.
उभारणीपासून ते आतापर्यंत चर्चेत असणाऱ्या जरंडेश्वर साखर कारखान्याची ‘१८ वर्षांची’ अशी आहे लढाई
तसेच, याबाबत अधिक सांगताना त्यांनी, “बँकेने जिल्ह्यातील अनके कारखान्यांना कर्जपुरवठा केला आहे. हा कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केला आहे. जरंडेश्वर कारखान्यालाही बँकेने २०१७ मध्ये १३२ कोटींचा कर्जपुरवठा केला होता. त्यांच्याकडून या घडीला एकूण ९६.५० कोटी रूपये येणे बाकी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Read Also :
- अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
- जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
- “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
- नितीन गडकरींच्या खासदारकीवर, नाना पटोलेंचा आक्षेप; दाखल केलेल्या याचिकेवर ६ ऑगस्टपासून सुनावणी
- “…तर राज्य सरकार विरोधात पुन्हा तीव्र मूक आंदोलन सुरु करावे लागले”