सातारा: महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातारा जिल्ह्यात स्थित असणाऱ्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी सहकारी साखर कारखाना होता. मात्र अडचणीच्या काळात महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज त्यांच्याकडून घेण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव करण्यात आलेला होता. त्यानंतर कारखाना खासगीरित्या विकत घेतला होता. कारखान्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच हा कारखाना नेहमीच चर्चेत राहिला होता.
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
हे पण वाचा, श्री छत्रपती शाहू साखर कारखाना देशात ठरला अव्वल; गुणवत्तापूर्ण साखर उत्पादनासाठी मिळाली ‘ही’ मानांकने
जरंडेश्वर कारखाना पहिल्यांदा शंभर कोटींच्या थकीत कर्जानंतर चर्चेत आला होता. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने शंभर कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी १६ जुलै २०१० साली जप्त केला होता. यावेळी कारखाना संस्थापक असणाऱ्या आणि माजी आमदार व महसूलमंत्री शालिनीताई पाटील यांच्या ताब्यात होता. कोरोगाव व खटाव तालुक्यातील सुमारे २७ हजार सभासद तसेच साडेसहाशे कामगारांच्या रोजी रोटीचा यावेळी प्रश्न निर्माण झाला होता. कारखान्याचा त्यानंतर सप्टेंबर २०१० रोजी लिलाव करण्यात आला.
हे पण वाचा, अजित पवार आणि चंद्रकांत पाटील पुन्हा आमने सामने; ED चौकशीवरून रंगली जुगलबंदी
हे पण वाचा, ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
कारखान्यांची लिलावची किंमत त्यावेळी ४०.८० कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती. लिलावात १३ संस्थांनी बोली लावली होती. यामध्ये राजाराम बापू सहकारी साखर कारखाना, किसन वीर सहकारी साखर कारखाना, दौंड शुगर, वारणा कारखाना, चंद्रभागा शुगर मुंबई आदींचा समावेश होता. पहिल्या दोन बोलींचे लखोटे राज्य बँकेच्या मुख्य कार्यालयात सर्व बोली लावणाऱ्यांच्या समोर उघडून जाहीर करण्यात आली होती. मात्र तिसऱ्याफेरीच्या वेळी लखोटे बोली लावणाऱ्यांच्या समोर न खोल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर संचालक मंडळाची २८ सप्टेंबर २०१० रोजी बैठक झाली आणि यामध्ये बंद लखोटे खोलण्यात आले.
हे पण वाचा, जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
हे पण वाचा, जयवंतराव भोसले पॅनलची अंतिम विजयाकडे घौडदौड सुरु; पहिल्या पाचही जागांवर निर्विवाद वर्चस्व
सर्वाधिक बोली मुंबईतील गुरु कमोडिटी शुगर प्रा. ली. यांनी लावली होती. त्यांनी सुरुवातील ३० कोटी, दुसऱ्या फेरीत ३५ कोटी, तिसऱ्या फेरीत विक्रमी अशी ६५.६७ कोटींची बोली लावली. त्यानंतर त्यांच्याकडे कारखाना सुपूर्द करण्यात आला. या वेळच्या बैठकीत तत्कालीन ऊर्जामंत्री आणि बँकेचे संचालक अजित पवार, बँकेचे अध्यक्ष माणिकराव पवार, तत्कालीन विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, खासदार आनंदराव अडसूळ, लक्ष्मणराव पाटील व कार्यकारी संचालक डी. एम. मोहोळ आदी उपस्थित होते.
हे पण वाचा, ईडी म्हटलं की लोक घाबरतात, तुमचा भुजबळ करु असं सांगतात
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
या लिलावानंतर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्ष आणि माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी जप्ती व लिलाप या प्रक्रियांवर आक्षेप घेतला आणि विविध न्यायालयात दाद मागितली होती. डॉ. शालिनीताई पाटील यांनी कारखाना ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना यश आले नाही.अठरा वर्षांसाठी त्या कारखान्याला वाचवण्यासाठी विविध न्यायालयांमध्ये दाद मागत होत्या. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील हा कारखाना वाचावा यासाठी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने गुन्हा दाखल केला होता.
हे पण वाचा, “अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच खोट्या बातम्या पेरण्याची कटकारस्थानं सुरू”
हे पण वाचा, “जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग” संस्थापक डॉ. सुरेश भोसले
२६ ऑगस्ट रोजी ईडीने पीएमपीएल या कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. कारखाना किरकोळ किंमतीत विकला गेल्याने अण्णा हजारे यांनी आक्षेप नोंदविला होता.सध्या कारखाना जरंडेश्वर साखर मिल, स्पार्किंग सॉईल प्रा. ली. यांना लीजवर देण्यात आला होता. जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये स्पार्किंग सॉइलचे बहुसंख्य शेअर्स आहेत आणि संबंधित कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याने ईडीने म्हटलं आहे. त्यानुषंगाने ईडीने केलेल्या कारवाईला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे.