कोल्हापूर: श्री छत्रपती शाहू कारखान्याला TUV Rhienland यांच्याकडून ISO 14001:2015 आणि ISO 45001:2018 ही मानांकने मिळाली आहेत. हे मानांकन मिळाल्यानंतर छत्रपती शाहू कारखान्याचे विद्यमान चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित केले आहे. १९७७ साली छत्रपती शाहू कारखान्याची नोंदणी करण्यात आली होती. स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांनी खूप मेहनतीने या कारखान्याची उभारणी केली. सभासद आणि कर्मचाऱ्यांनी कारखाना नावारूपास यावा यासाठी अतोनात कष्ट घेतले. आणि आज सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की ही मानांकने मिळविणारा श्री छत्रपती शाहू साखर कारखाना हा देशातील सर्वात पहिला साखर कारखाना ठरला आहे असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा, जयवंतराव भोसले पॅनलची अंतिम विजयाकडे घौडदौड सुरु; पहिल्या पाचही जागांवर निर्विवाद वर्चस्व
छत्रपती शाहू कारखान्याला आत्तापर्यंत ६२ पुरस्कार मिळालेले आहेत. ६२ वा पुरस्कार हा ‘बेस्ट शुगर फॅक्टरी’ हा होता. यावर्षी कारखान्याने सर्वात जास्त विक्रमी असे १० लाख १७ हजार उसाचं गाळप केलं आहे. साखर उत्पादनातही कारखान्याने विक्रम प्रस्थापित करत १२ लाख पेक्षाही जास्त उत्पादन केलेलं आहे. उसाच्या रसा पासून एथोनॉलची निर्मिती करणारे देशात अत्यंत कमी साखर कारखाने असताना त्यांच्यामध्ये देखील छत्रपती शाहू कारखान्याचा समावेश होतो ही अत्यंत अभिमानपूर्वक बाब आहे असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा, कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या मनावर राज्य करणारे सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पा..
हे पण वाचा, हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरकरांची जाहीर माफी मागितली.
कारखान्याला २००२ साली ISO ९००१ हे मानांकन मिळाले होते. त्यानंतर २०१५ साली त्यात वाढ झाली आणि FSSC २२००० अन्न सुरक्षा कायद्यानुसार देखील कारखान्याला प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. साखरेला अरब देशांत विकण्यासाठी मिळणाऱ्या परवानगीचचं तसेच ज्यू देशांमध्ये देखील साखर विकण्याचे प्रमाणपत्र आपल्याला मिळाले आहे. अगदी खालच्या पातळीवर कार्य करणारे कर्मचारी असो वा वरच्या पातळीवरील पदस्थ पदाधिकारी, या सर्वांनी केलेल्या मेहनतीमुळे आजचा हा दिवस पाहायला मिळत आहे असे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा,
कोल्हापुरात गोकूळनंतर आता कोरोनाच्या मुद्द्यावरून महाडिक – पाटील गट आमने सामने
सतेज पाटील आणि हसन मुश्रिफांकडून गोकुळची झाडाझडती; अधिकाऱ्यांना धरले धारेवर
गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा