अकोले: निवृत्त अधिकारी बी. जे देशमुख आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते दशरथ सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन अगस्ती साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर आर्थिक अफरातफरी बद्दल गंभीर आरोप केले होते. संचालक मंडळ हे नुसतं मंडळ नसून ती एक टोळी आहे असा आरोप करत अगस्ती साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे आता ठीक वाटत नसून आम्ही अगस्ती कारखान्यासाठी दिवसरात्र एक केलेली आहे आणि त्यामुळेच राजीनामे देत आहोत अशी भूमिका जेष्ठ संचालक सीताराम गायकर यांनी संचालक मंडळातर्फे मांडली आहे.
हे पण वाचा, राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या साई संस्थानाच्या अध्यक्षपदासाठी चार आमदारांची रस्सीखेच
हे पण वाचा “निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
हे पण वाचा, अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
अगस्ती कारखान्याबाबत एका घातकी टोळीकडून अत्यंत घाणेरडा अपप्रचार कारखान्याच्या बाबतीत सुरु आहे. याटोळीने अक्षरशः आता जेरीस आणले आहे. कारखान्यातील संचालक मंडळाला मानसिक तणावात ढकलण्याचे काम त्यांच्याकडून सातत्याने सुरु आहे. त्यामुळे कारखान्याच्या संचालक मंडळाने चेअरमन साहेबंकडे आपले राजीनामे सुपूर्द केले आहेत. जिल्हा बँकेकडून कर्ज न घेता जर कोणी साखर कारखाना चालवून दाखवणार असतील तर त्यांनी आजच समोर यावे आम्ही त्यांना संपूर्ण संचालक मंडळ बहाल करण्याची जबाबदारी घेतो असे जेष्ठ संचालक सीताराम गायकर यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा, शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
हे पण वाचा, नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
हे पण वाचा, अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
आम्ही आता जशास तसे उत्तर देणार असल्याची भूमिका घेतली आहे. दोन चार महिन्यांनंतर निवडणूक लावायची इच्छा असेल तर सांगा. आम्ही फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना उत्तर देण्यास बांधील आहोत. कोणत्याही परिस्थितीत अगस्ती वाचवण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. आता आर या पार तुम्ही होऊनच जाऊद्या असे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मधुकर पिचड यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासापोटी आम्ही इथे बसलेलो आहोत आणि पुन्हा देखील बसू मात्र आता तुम्ही चोरांच्या टोळीने अगस्ती ला बदनाम करण्याचे षडयंत्र थांबवावे असे आवाहन देखील मधुकर पिचड यांनी यावेळी केले आहे. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर आदी उपस्थित होते.
हे पण वाचा,
कुकडीच्याही पाण्यात मशाल पेटली, न्यायालयीन लढ्यासाठी कुकडी संघर्ष समिती स्थापन
नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
नागपूर: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही