मुंबई : ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून एकामागोमाग एक संकटं समोर उभी राहत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आधी संजय राठोड आणि नंतर अनिल देशमुख या ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे द्यावा लागला.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी, या ठाकरे सरकारमधल्या अजून एका मंत्र्यांचा राजीनामा लवकरच दिला जाईल, अशी आवई उठवली होती. त्यानंतर आता कुणाचा नंबर लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती. त्यानंतर आता अनिल परब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, त्याची आता सखोल चौकशी सुरु असून, यातच ठाकरे सरकारमधील आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या कार्यालयात डायरी घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वतःच्या प्रचारासाठी लागणाऱ्या डायऱ्यांचा खर्च, महावितरणच्या तिजोरीतून वसूल करण्याचा त्यांच्यावर आरोप केला जात असून, या डायऱ्यांचा एकूण खर्च ५ लाख एवढा असल्याचं बोललं जात आहे. तसेच, या डायऱ्या विनानिविदा काढण्यात आल्या असल्याचं भाजप माध्यम प्रभारी विश्वास पाठक यांनी सांगितलं आहे.
या महामारी संकटात सरकारच्या कुठल्याही विभागाने किंवा मंत्र्याने कॅलेंडर, डायरी, शुभेच्छापत्र यासाठी कुठलाही खर्च करू नये, असे आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने २०२० च्या सप्टेंबरमध्ये दिले होते, तर तीन लाखांहून अधिक खर्च असल्यास संबंधीत विभागाला निविदा काढावी लागते. मात्र, राऊत यांनी स्वतःच्या प्रचारासाठी लागणाऱ्या डायऱ्यांचा खर्च, ५ लाखांच्यावर असूनही तो विनानिविदा असल्यानं, महावितरणच्या वित्त विभागानेच त्यावर आक्षेप घेत, तो नामंजूर केला आहे.
Read Also :
- ‘आम्ही जाहीर केलेल्या EWS आरक्षणाचा मराठा समाजाने लाभ घ्यावा’
- ‘माझ्या लग्नाची एवढी चिंता का? चंद्रकांत पाटील यांच्याशी यासंदर्भात मी वेगळी चर्चा करेन’
- संजय राऊत यांची अवस्था “ना घर का ना घाट का”
- आम्हाला निवडणुकीची आणि पराभवाची भीती नाही, ज्यांना असं वाटत असेल ती त्यांची पोटदुखी आहे
- ‘चंद्रकांत पाटलांचा तोल ढळला आहे, त्यांना…’ शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांची खरमरीत टीका