मुंबई : मुख्यमंत्र्यांनी रविवारी त्यांच्या जनसंवादात पंतप्रधान मोदींना पत्र लिहिण्याचा उल्लेख केला होता. हाच संदर्भ घेऊन आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
‘ठाकरे सरकार प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवत, केंद्राकडे ढकलत आहे. असं असेल तर मुख्यमंत्री उद्या पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठीसुद्धा पंतप्रधांनांनाच पत्र लिहतील,” असा जोरदार टोमणा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.
दरम्यान, आता यावर खुद्द आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं असून, ‘माझ्या लग्नाची एवढी चिंता का? चंद्रकांत पाटील यांच्याशी यासंदर्भात मी वेगळी चर्चा करेन, पण आत्ता वातावरण चांगलं ठेवावं आणि राहिला प्रश्न माझ्या लग्नाचाच, तर माझ्या लग्नाची एवढी चिंता का?,’ असा प्रश्न त्यांनी पाटलांना केला आहे.
तसेच, भाजप नेते आशिष शेलार यांनी या मुद्द्यावरून शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असून, मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी, ‘मुदतपूर्व निवडणुका, निवडणुका पुढं ढकलण्यासाठी महामारीचा बहाणा, २०११ च्या जनगणनेवर आधारित नवी प्रभाग रचना, ३० प्रभाग फोडण्याचा प्रयत्न, असे शिवसेनेचे डाव आहेत. मात्र, आम्ही ते यशस्वी होऊ देणार नाही,’ असा इशारा दिला आहे.
यावर देखील आदित्य ठाकरे यांनी वक्तव्य केलं असून, ‘त्यांच्या आरोपांबद्दल मी काहीही अजून ऐकलं नाही,’ असं सांगत त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला.
Read Also :
- संजय राऊत यांची अवस्था “ना घर का ना घाट का”
- आम्हाला निवडणुकीची आणि पराभवाची भीती नाही, ज्यांना असं वाटत असेल ती त्यांची पोटदुखी आहे
- ‘चंद्रकांत पाटलांचा तोल ढळला आहे, त्यांना…’ शिवसेना प्रवक्ते किशोर कान्हेरे यांची खरमरीत टीका
- कटकमिशनचे धंदे बंद करा! मुंबई महापालिकेच्या निवडणुकांवरुन भाजपने केले शिवसेनेवर ४ गंभीर आरोप
- ‘आदित्य ठाकरेंच्या लग्नासाठी मुलगी बघा! म्हणूनसुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधांनाना पत्र लिहितील’