मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काल राज्याचे मंगल प्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेची शिंदेंच्या बंडाशी तुलना केली होती. त्यावरून राज्यभरातून त्यांच्यावर टिका केली जात आहे. यातच शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदेंना खोचक टोला हाणला आहे.
स्वत: ला हिंदुत्ववादी म्हणून घेणारेच मंदिराची जमीन हडपाताहेत”; काॅंग्रेसने भाजपला डिवचलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणला. आम्ही फक्त हिंदुत्वासाठी आघाडीतून बाहेर पडल्याचं शिंदे वारंवार सांगत आहेत. यातच मंगल प्रभात लोढा यांनी केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंचं तापलं आहे. यावरून आदित्य ठाकरे म्हणाले की, इमान विकलेल्या गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं हे हिंदुत्व नाही, हा महाराष्ट्र द्वेष आहे. महाराष्ट्राचं खच्चीकरण हेच या खोके सरकारचं ध्येय आहे. असा टोलाही त्यांनी हाणला.
भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ.! देवस्थान जमीन घोटाळ्या प्रकरणी गुन्हा दाखल
मंगल प्रभात लोढा यांनी काल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात मोठा गोंधळ माजला. त्यातच आज पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपतींच्या गिमीनी काव्याची तुलना शिंदेंच्या बंडाशी केली आहे. त्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलंचं चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून विरोधी पक्ष रस्त्यावर उतरण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.
“शेतकऱ्यांचा मुलगा हेलिकॉप्टरने जाऊ शकत नाही का?” मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात शिंदे सरकारमधील मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. सातत्याने केली जाणारी वादग्रस्त व्यक्तव्यावरून काल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या वाचाळवीरांना आतातरी आवरा असा इशाराही त्यांनी काल दिला होता.
Read also
- वाचाळवीर थांबता थांबेना..! आता शिंदे गटातील आमदारांनी महाराजांच्या गिनीमी काव्याची केली तुलना
- मोठी बातमी..! नागपुर येथील आरएसएसचं मुख्य कार्यालय उडवून देण्याची धमकी
- रिक्षाचालक संघटनांमध्ये मोठा वाद..! नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बाबा कांबळेंना आंदोलन समितीतून वगळलं
- “मी ऐकदा काय म्हटलं होतं ते अजित पवारांनी बघावं”; मंगल प्रभात लोढा
- “मोदी साहेब…! तुम्ही तुमच्या मेंटॉॅंस लोकांना तंबी देणार आहे का?” अन् रूपाली पाटील भडकल्या