सातारा : देशात हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री दाखवा अन् बक्षीस मिळवा, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्र्यांना लगावला होता. त्यावर शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने काहींचा पोटशुळ सुटला आहे. शेतकरी हेलिकॉप्टरने शेती करायला जाऊ शकत नाही का ? असा उलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.
“मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढविणार”; राज ठाकरेंची घोषणा
आज प्रतापगडावर 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, अनेक शिवभक्त, तसेच मावळ्यांची एक भावना होती. या गडावर असलेले अतिक्रमण दुर झाले पाहिजे, असे मत प्रत्येकाचे होते. कायद्याने, नियमाने काम करण्याचे धाडस काही लोक दाखवत नव्हते. मात्र छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आता आपले सरकार स्थापन झाले आहे. असंही ते म्हणाले.
रूपाली पाटलांचा आक्रमकपणा आणखी वाढणार..; राष्ट्रवादीने सोपविली प्रवक्ते पदाची जबाबदारी
तसेच आपल्या प्रत्येक मंत्रीमंडळ बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येतात. न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रतापगडावरील अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजी महाराजांचा इतिहास कोणालाही पुसता येणार नाही. शिवरायांची साक्ष देणारा प्रत्येक विषय राज्य सरकार पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. असंही ते म्हणाले.
येलवाडी गायरान संबंधी घरे कायम करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ‘आप’चा इशारा”
दरम्यान, शिवाजी महाराज यांनी जलदुर्ग बांधले. आजही अनेक किल्ले शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे साक्ष देतात. शिवाजी महाराज यांना आरमारचे जनक म्हटले पाहिजे. हे किल्ले नव्या पिढीला प्रेरणा देणारे आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे. असंही ते म्हणाले.
Read also
- राज्यात पुन्हा एकदा वाद..! महाराजांच्या आग्रा सुटकेशी तुलना शिंदेंच्या बंडाशी
- “ती टिप्पणी प्रकृतीवर नाही तर परिस्थितीवर होती”; उद्धव ठाकरेंवर केलेल्या टिकेवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण
- देवेंद्र फडणवीसांची इडीकडून चौकशी होणार..! बनावट स्टॅम्प घोटाळ्यात सहभाग.?
- “मला मंत्रिपद न मिळाल्याचं दु: ख आता मी विसरून गेलोय”; बच्चू कडू
- “माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता, पण..,” जितेंद्र आव्हाडांचा रोख नेमका कुणाकडे ?