मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची हर हर महादेव चित्रपटात मोडतोड केल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गदारोळ माजवला होता. त्यानंतर ठाण्यातील माॅलमध्ये आव्हाडांनी चित्रपटाचे शो बंद पाडण्याच्या नादात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रक्षेकाला मारहाण केल्याने आव्हाडांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी माझ्यावर कट रचण्याचा डाव होता अशी माहिती आता आव्हाडांनी दिली आहे.
“महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज”; छगन भुजबळ
विवियना मॉल मध्ये जितेंद्र आव्हाडांसोबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रक्षेकाला मारहाण केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने राज्यात जोरदार आंदोलने केली अन् आव्हाडांना जामीन मंजूर झाला. त्यातच आता विवयना मॉलमध्ये झालेल्या गदारोळानंतर माझ्यावर 354 चा कट रचण्यात आला होता. पण तो फसला पण त्यात मनसेच्या कुठल्या ही नेत्याचा सहभाग नव्हता. ज्यांनी मुंबऱ्याचा कट रचायला लावला. तेच रचत होते विवियानाच्या तक्रारदरावर दबाव टाकून कट ह्यात इतर कुठल्याही पक्षाचा संबंध नाही. असं आव्हाडांनी सांगितले आहे.
“सध्या राजकारणाची पातळी खुपच घसरली, आत्मचिंतनाची गरज”; सुप्रिया सुळे
त्याचबरोबर तक्रारदारांनी स्वत: कबूल केले की जितेंद्र आव्हाडांनी मला बाहेर काढले तर मग माझे नाव गुन्हात आले कसे. मनसेच्या ठाण्याच्या नेता जर पोलीस स्टेशनला होता. तर हे त्यांनी थांबवायला हवे होते. पण 354 च्या कटात तो नव्हता हे सत्य आहे. ताईला सगळे माहीत आहे. असं म्हणत त्यांनी कुणावर रोख टाकला आहे. याचा अजूनही काही अर्थ लागत नाहीय.
विवियना मॉल मध्ये झालेल्या गदारोळा नंतर माझ्यावर ३५४ चा कट रचण्यात आला होता पण तो फसला पण त्यात मनसे च्या कुठल्या ही नेत्याचा सहभाग नव्हता ज्यांनी मुंबऱ्याचा कट रचायला लावला तेच रचत होते विवियानाच्या तक्रारदरा वर दबाव टाकून कट ह्यात इतर कुठल्या ही पक्षाचा संबंध नाही
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 30, 2022
Read also
- “मुंबई महापालिकेची निवडणुक स्वबळावर लढविणार”; राज ठाकरेंची घोषणा
- रूपाली पाटलांचा आक्रमकपणा आणखी वाढणार..; राष्ट्रवादीने सोपविली प्रवक्ते पदाची जबाबदारी
- येलवाडी गायरान संबंधी घरे कायम करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा ‘आप’चा इशारा”
- “या साठी संजय राऊतांना आमचा पुर्ण शर्त पाठिंबा..;” शिंदे गटातील मंत्र्यांचं वक्तव्य
- “बेळगावात बोलवून माझ्यावर हल्ला आणि कट रचण्याचा प्रयत्न”; संजय राऊत