मुंबई : राज्यात मागील काही दिवसापासून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यपाल, मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
“या मस्तवाल लोकांविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा”; राष्ट्रवादीची मागणी
महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी सध्या घसरत चालली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्राची वेगळी संस्कृती आपल्या ज्येष्ठांनी जपली आहे. ती कुठेतरी ढासळताना दिसते. सुसंस्कृतपणा पुन्हा जपण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून केला पाहिजे. अशी प्रतिक्रिया सुळे यांनी दिली आहे. तसेच सातत्याने भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष राज्यपालांची पाठराखण करत आहे. त्याचा जाहीर निषेधही सुळेंनी केला.
राजकीय वार….! काहींना जनाची नाही अन् मनाचीही नाही;” ठाकरेंच्या क्लिपला फडणीसांचं क्लिप उत्तर
त्याचबरोबर राजकारण बाजूला ठेऊन छत्रपती शिवरायांच्या मान-सन्मानासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. असंही त्यांनी म्हटलं. तर राज ठाकरे यांच्या भाषणाकडेही त्यांनी लक्ष्य वळविलं. राज ठाकरे यांचे भाषण ऐकले. त्याचेही स्वागत करते. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी एकत्र लढले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. शेतकरी केवळ राज्यात नव्हे तर देशात अडचणीत आहे. त्याला हमी भाव वेळेवर मिळत नाही. वास्तवतेपेक्षा दुर असणार हे सरकार आहे. अशी टिकाही त्यांनी केली.
“ताई मोठ्या हुशार, थेट पंतप्रधानांना राखी बांधली अन्…;” उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं
अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची आज वीज कापली जाते ते अतिशय चुकीचे आहे. उपमुख्यमंत्र्यांनीच विरोधी पक्षनेते असातना विधान केले होते की, वीज तोडू नका तर मध्यप्रदेशाचे मॉडेल आणा. त्याप्रमाणे अंमलबजावणी त्यांनी करावी, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. पीक विम्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली पाहिजे. मी हा विषय पार्लामेंटच्या सेशनमध्ये मांडणार आहे, असे त्या म्हणाल्या. वाचाळवीरांना आवर सत्तेत असलेल्या लोकांनी घालायला पाहिजे. मुख्यमंत्री पदावर बसणारा व्यक्ती केवळ पक्षाचा नसतो तर राज्याचा असतो. याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. सुसंस्कृतपणा दाखवून यातून मार्ग काढावा. महागाई आणि बेरोजगारी ही सर्वात मोठी आव्हान देशाच्या आणि राज्याच्या समोर आहेत. यावरही चर्चा झाली पाहिजे, असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
Read also
- “अरेच्चा विसरलेच, सध्या तुमच्या मताला किंमतच नाहीय”; चित्रा वाघ यांच्यावर सुषमा अंधारेंचा घणाघात
- “चुक केली होती, ती फक्त दुरूस्त केली”; कृष्णा हेगडे यांची प्रतिक्रिया
- उद्धव ठाकरेंना मोठा धक्का…! सेनेचा माजी आमदार शिंदे गटात
- “अजित पवारांनी आपल्या उंचीचा विचार करून बोललं पाहिजे”; भाजपचा खोचक टोला
- राज्यपालांना पदमुक्त करण्याचे फडणवीसांकडून स्पष्ट संकेत, म्हणाले, “आम्ही देखील…;”