बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला गाठलं. त्याठिकाणी त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात सभा घेऊन बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. यावेळी एकनाथ शिंदे, भावना गवळी, अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून प्रहार केला. तसेच त्यांनी भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजबीलाबाबत केलेल्या वक्तव्याची भर सभेत क्लिप काढून लोकांना ऐकवली. त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी तोफ डागली आहे.
“देशातील ‘इमानदार नेता’ म्हणून फक्त मी च छाती ठोकून सांगू शकतो”; अरविंद केजरीवाल
उद्धव ठाकरे यांनी सभेत वीजबीलासंदर्भात एक जूनी क्लिप देवेंद्र फडणवीस यांची दाखवली. त्यानंतर लगेचच फडणवीसांनीही उद्धव ठाकरे यांची जुनी क्लिप व्हायरल करून उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही…! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय् त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे.
“शरद पवार, उद्धव ठाकरे अन् अजित पवारांची मला किव येते”; गुणरत्ने सदावर्ते
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात असं म्हटलं की, नागपूर अधिवेशनात मी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. माध्यमांसमोर विचारले शेतकऱ्यांना. खोके सरकार गादीवर आले आणि पनवती सुरु झाली. कसला नवस फेडता आणि शेतकरी दुर्लक्षित. अन्नदाता शेतकरी विचारतो खायच काय? पंतप्रधान म्हणतात मी दोन तीन किलो शिव्या खातो. तुमच ठिक आहे शिव्या खाऊन जगता पण शेतकऱ्यांचे काय? मागे मोर्चा काढला वठणीवर आले विमावाले आता पुन्हा आणावे लागेल डीपी जळते, बीड पॅटर्न मविआने आणला. फडणवीसांचे जुने विधान ऐकवले. देवेंद्र जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना वीजबिल माफ करा. वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले किती लोकांना मिळाले चॅनलवाल्यांनी हे दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे.
काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही…!
2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय्… pic.twitter.com/KVfRik8bRe
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 26, 2022
Read also
- “ताई मोठ्या हुशार, थेट पंतप्रधानांना राखी बांधली अन्…;” उद्धव ठाकरेंनी भावना गवळींना डिवचलं
- “पंतप्रधान म्हणतात, मी दोन तीन किलो शिव्या खातो, पण शेतकऱ्यांचे काय?” उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
- “देवेंद्र जरा जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगा”; अन् उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांची जुनी क्लिप
- “शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत, पण आमचं नवस अजून पुर्ण झालं नाही”; बच्चू कडू
- “गुणरत्ने सदावर्ते दारू पिऊन करतो की काय?” जितेंद्र आव्हांडाची खोचक प्रतिक्रिया