बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला गाठलं. त्याठिकाणी त्यांनी कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यात सभा घेऊन बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. यावेळी एकनाथ शिंदे, भावना गवळी, अब्दुल सत्तार यांच्यावर कडाडून प्रहार केला. तसेच त्यांनी भाजप आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजबीलाबाबत केलेल्या वक्तव्याची भर सभेत क्लिप काढून लोकांना ऐकवली. त्यामुळे आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी तोफ डागली आहे.
“शरद पवार, उद्धव ठाकरे अन् अजित पवारांची मला किव येते”; गुणरत्ने सदावर्ते
अनेक महिन्यांनंतर वर्षांनंतर आपल्या दर्शनाला आलो आहे. दसरा मेळाव्यानंतरच आई जिजाऊंच्या जन्मस्थानी आशीर्वाद घेऊन सुरुवात करायची, म्हणून बुलढाण्यात आलो. आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षीत आहे का? काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना. असं म्हणत तेच बोलले आमचे रेडे. आज नवस फेडायला गेले परवा हात दाखवायला गेले होते. तुमच भविष्य तुम्हाला माहिती नाही आणि हे राज्य चालवणार. दिल्लीने म्हटले की उठायचे बस म्हटले की बसायचे.
“राज्यात ठाकरे हेच खरं सरकार, तुम्ही आज बघतच रहा, ;” ठाकरेंची बुलढाण्यात आज सभा
काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगला शिवसैनिक. ते परत आले. आज सगळे काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे. कसे नेले इथल्या ताई मोठ्या हुशार थेट पंतप्रधानांना राखी बांधली फोटो छापून आणला. ही चालूगिरी लोक बघत नाहीएत. भाजप आज आयात पक्ष, भाकड पक्ष. यादी काढा मग समजेल किती आयात लोक. स्वतः चंद्रकांत पाटील बोलले. मनावर दगड ठेवला. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपाच्या टिकिटावर लढणार नाही. बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे? छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवताहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगताहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊ पणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला.
पोलिसांना चकवा देत संभाजी ब्रिगेडने सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम केला..!
काल अमित शहा बोलले आम्ही धडा शिकवला. पण बाबरी पाडल्यावर शिवसेना उभी राहिली, अमरनाथ यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख उभे राहिले. आमच दैवताचा पुराने आदर्श म्हणून उल्लेख करतात. सत्तारने सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून हाकलला असता. महाराष्ट्राचा अपमान होतोय, देवतांचा अपमान होतोय तुम्ही सहन करता हे असले बाळासाहेबांचे विचार नाहीत. ज्योतिषाला हात दाखवता, आज शहीद दिवस हे नवस फेडायला. शेतकऱ्यासाठी वेळ नाही. पीकविमा मिळाला तुम्हाला. बुलढाण्यातला शेतकरी बांधवाचा उल्लेख.
नागपूर अधिवेशनात मी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली. माध्यमांसमोर विचारले शेतकऱ्यांना. खोके सरकार गादीवर आले आणि पनवती सुरु झाली. कसला नवस फेडता आणि शेतकरी दुर्लक्षित. अन्नदाता शेतकरी विचारतो खायच काय? पंतप्रधान म्हणतात मी दोन तीन किलो शिव्या खातो. तुमच ठिक आहे शिव्या खाऊन जगता पण शेतकऱ्यांचे काय? मागे मोर्चा काढला वठणीवर आले विमावाले आता पुन्हा आणावे लागेल डीपी जळते, बीड पॅटर्न मविआने आणला. फडणवीसांचे जुने विधान ऐकवले. देवेंद्र जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना वीजबिल माफ करा. वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले किती लोकांना मिळाले चॅनलवाल्यांनी हे दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे.
Read also
- “पंतप्रधान म्हणतात, मी दोन तीन किलो शिव्या खातो, पण शेतकऱ्यांचे काय?” उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
- “देवेंद्र जरा जनाची नाही, तरी मनाची लाज बाळगा”; अन् उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांची जुनी क्लिप
- “शिंदे साहेब मुख्यमंत्री झालेत, पण आमचं नवस अजून पुर्ण झालं नाही”; बच्चू कडू
- “गुणरत्ने सदावर्ते दारू पिऊन करतो की काय?” जितेंद्र आव्हांडाची खोचक प्रतिक्रिया
- “देशातील ‘इमानदार नेता’ म्हणून फक्त मी च छाती ठोकून सांगू शकतो”; अरविंद केजरीवाल