बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपल्या बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा दौऱ्यावर आले आहेत. याठिकाणी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तर दुपारी त्यांची ऐतिहासिक सभा पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंची चिखलीत एल्गार सभा..! गुवाहाटीला गेलेल्या बंडखोरांवर तुटून पडणार?
उद्धव ठाकरे हे आज शेतकऱ्यांच्या भेटीला चालले आहेत. ठाकरे हेच खरं सरकार आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर आज बुलढाण्यात सभा होईल. ही सभा ऐतिहासिक होणार आहे. अनेक लोक सोबत येत आहेत. भारतीय जय हिंद पार्टीने आम्हाला पाठिंबा जाहीर केला आहे. असंही ते म्हणाले. तसेच राज्यपाल चुकीचं विधान करतात. कर्नाटचे मुख्यमंत्री महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त बोलतात आणि रामदेव बाबा महिलांना लज्जास्पद बोलतात. एवढं सगळं सुरू असतांना सरकार गप्प का? असा सवालही राऊतांनी केला आहे.
एकनाथ शिंदे- अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद.? गुवाहाटीला न जाण्याचं कारणही सांगितलं
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत. शिवसेेनेचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, आणि नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदेंना पाठिंबा दिला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठका सुरू केल्या. आता त्यांचा पुन्हा एकदा राजकारणात वावर दिसणार असून त्यांची त्यानंतरची ही पहिलीच बाहेर सभा असणार आहे.
Read also
- पोलिसांना चकवा देत संभाजी ब्रिगेडने सदावर्तेंचा करेक्ट कार्यक्रम केला..!
- “जनता वाऱ्यावर अन् मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावर.!” काॅंग्रेसची शिंदेंवर जहरी टिका
- राज्यपाल हटाओ…! “पायात चपला घालून राज्यपालांकडून 26/11 च्या शहिदांच्या स्मृतीत अभिवादन”
- “हे माता कामाख्या देवी..! जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे”, रोहित पवारांचं ट्विट
- “काय झाडी, काय डोंगरचा पार्ट-2 येणार..!’ गुवाहाटीला निघण्याअगोदर शहाजी पाटलांचं विधान