मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा गुवाहाटीला रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या विरोधात बंड करून त्यांनी थेट गुवाहाटील गाठलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. यावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
“गुवाहाटीला निघालेल्या आमदारांचा कामाख्या देवी बळी घेणार”; राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
महाराष्ट्रातून प्रकल्प, गावं पळवली जाताहेत. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. पण मुख्यमंत्र्यांना गुवाहाटाली जायचं आहे. जनतेला वाऱ्यावर सोडून गुवाहाटीला जायचं होतं तर मग तिथेच राहायचं असतं. असा टोला काॅंग्रेसने एकनाथ शिंदे यांना लगावला आहे. तसेच जनता वाऱ्यावर आणि मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावर अशी खोचक टिप्पणी केली आहे.
“अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”; रामदेव बाबाचं वक्तव्य
त्याचबरोबर संत ज्ञानेश्वरांनी पैठणच्या नाग घाटावर 750 वर्षापुर्वी रेड्या मुखी वेद वदवले होते. या ऐतिहासिक घटनेने रेड्याचेही महत्व वाढले. आता युग बदलले व रेडे 50 खोक्यात एकदम ओक्के होऊन झाडी डोंगर फिरायला लागले. फरक इतकाच त्यावेळेचा रेडा ज्ञानोबांनी बोलता केला आजचा रेडा नाथाने शांत केला आहे. असा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
जनता वाऱ्यावर आणि मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यावर! pic.twitter.com/TuCkTmGy0U
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 26, 2022
Read also
- राज्यपाल हटाओ…! “पायात चपला घालून राज्यपालांकडून 26/11 च्या शहिदांच्या स्मृतीत अभिवादन”
- “हे माता कामाख्या देवी..! जे हवं ते सर्व राज्य सरकारला दे”, रोहित पवारांचं ट्विट
- “काय झाडी, काय डोंगरचा पार्ट-2 येणार..!’ गुवाहाटीला निघण्याअगोदर शहाजी पाटलांचं विधान
- उद्धव ठाकरेंची चिखलीत एल्गार सभा..! गुवाहाटीला गेलेल्या बंडखोरांवर तुटून पडणार?
- एकनाथ शिंदे- अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद.? गुवाहाटीला न जाण्याचं कारणही सांगितलं