मुंंबई : आज राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांना घेऊन गुवाहाटी दर्शनाला गेले आहेत. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुलढाणा येथे जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर तुटून पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“अमृता वहिनी, हसून दाद देण्यापेक्षा रामदेव बाबांच्या कानाखाली मारली असती.!”रूपाली पाटील कडाडल्या
आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांनासह गुवाहाटीला रवाना झालेत. ते दुपारी एकच्या सुमारास गुवाहाटीला पोहचणार आहेत. त्याठिकाणी दोन दिवसासाठी त्यांनी एका हॉटेलमध्ये जवळपास 100 खोल्या देखील बुक केल्या असून त्याठिकाणी ते दोन दिवस थांबणार आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यातील चिखली येथे जाहीर सभेचे अयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शिवसेनेचा भव्य शेतकरी संवाद मेळावा होणार आहे. त्यामुळे या सभेत उद्धव ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधतीलच पंरतु एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे आज राजकीय वातावरण चांगलचं तापण्याची शक्यता आहे.
Read also
- एकनाथ शिंदे- अब्दुल सत्तार यांच्यात मतभेद.? गुवाहाटीला न जाण्याचं कारणही सांगितलं
- “गुवाहाटीला निघालेल्या आमदारांचा कामाख्या देवी बळी घेणार”; राष्ट्रवादीने शिंदेंना डिवचलं
- “अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत”; रामदेव बाबाचं वक्तव्य
- “देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न केला जातोय, सावध रहा!” भुजबळांचं कार्यकर्त्यांना इशारा
- “रामदेव बाबा म्हणजे मनोहर भिडेचा यात्रेत हरवलेला मोठा भाऊ”; राष्ट्रवादीने साधला निशाणा