ठाणे : राज्यात वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू झाली आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात मोठा गोंधळ माजला होता. त्यातच आता योगगुरू रामदेव बाबा यांनी देखील महिलांबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.
शिरूरमध्ये काही तरी शिजतंय? खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी वाढती जवळीक?
पतंजली योगपीठ आणि मुंबई महिला पतंजली योग समितीच्या वतीने शुक्रवारी योग विज्ञान शिबीर आणि महिला संमेलानाचे आय़ोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी रामदेव बाबा महिलांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते म्हणाले की, महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात. आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. असे वादग्रस्त बाबा रामदेव यांनी केले आहे.
“देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपच”; काॅंग्रेसचा भाजपला टोला
तसेच याकार्यक्रमाच्या वेळी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. त्यांच्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. अमृता फडणवीस यांना तरूण राहण्याची एवढी लगन आहे की मला असं वाटतं अमृता फडणवीस 100 वर्ष म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण त्या खुप हिशोबात अन्न ग्रहण करतात. खुश राहतात. जेव्हा बघावं लहान मुलांसारखे हसत असतात. जेस स्मित हास्य अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे. तसाच स्मित हास्य मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर बघायचं आहे. असंही ते म्हणाले.
“विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल
दरम्यान, रामदेव बाबांच्या वादग्रस्तव वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील चांगल्याच संतापल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी रामदेव बाबांच्या व्यक्तव्यावर हसून दाद देण्यापेक्षा कानाखाली मारली असती तर महिलांना उपमुख्यमंत्री साहेबांच्या पत्नी सक्षम पणे महिलांच्या सक्षमतेसाठी सुरक्षेतसाठी आहातच याची खात्री झाली असती. महिलाच महिलेचा सन्मान वाढू शकते. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “एक दिवसासाठी माझ्याकडे इडी,सीबीआय सोपवा, भाजपचे अर्धे नेते तुरूंगात जातील”; अरविंद केजरीवाल
- “मालकाला खुश करण्यासाठी गुजरातची चाकरी;” राष्ट्रवादीने शेलारांना डिवचलं
- “एक पप्पू गेलेत आता दुसरे पप्पूही…;” नवनीत राणांचा आदित्य ठाकरेंना टोला, शरद पवार ही
- “शिंदे गट गुवाहाटीला कुणाचा बळी द्यायला चाललेत माहित नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
- यात्रेसाठी हजारो लोक झटले, घरचेचे कार्य समजून स्वच्छेने काम केले ; काॅंग्रेसने मानले आभार