नवी दिल्ली : सध्या देशात गुजरात आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभेचा धुमाकूळ सुरू आहे. त्यातच दिल्ली महापालिकेची निवडणुकही होऊ घातली आहे. भाजप आणि आप कडून गुजरातमध्ये जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच भाजप आपला वेगवेगळ्या मुद्यांवरून लक्ष्य करीत आहे. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला मोठं आव्हान दिलं आहे.
“देशात ट्रोल्स नावाच्या भस्मासूराचे जनक भाजपच”; काॅंग्रेसचा भाजपला टोला
भाजपची सत्ता आल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्यातील अनेक नेते तपास यंत्रणांचा रडारवर आले आहेत. यातच अरविंद केजरीवाल यांनी भाजपला इशारा दिला आहे. मला इडी, सीबीआयवर एक दिवसाचे नियत्रंण दिल्यास भाजपचे अर्धे नेते तुरूंगात जातील असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
“विकत घेतले आमदार म्हणून महाराष्ट्र विकायचा असतो का ?” राष्ट्रवादीचा खोचक सवाल
गेल्या सात वर्षामध्ये भाजपने आप नेत्यांवर 167 खटले दाखल केले आहेत. मात्र, एकाही खटल्यातील आरोप ते न्यायायात सिद्ध करू शकले नाहीत. 150 हून अधिक खटल्यांमधून आप नेते दोषमुक्त आहेत. तर उर्वरित खटले प्रलंबित आहेत. तपास यंत्रणेच्या 800 अधिकाऱ्यांकडून आप नेत्यांवर दाखल खटल्यांबाबत तपास करण्यात आला. मात्र त्यांना काहीही सापडले नाही. या यंत्रणांनी आपविरोधात खोटे खटले दाखल केल्यामुळे त्यांना न्यायालयात खेचण्यात आले आहे. असंही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Read also
- “मालकाला खुश करण्यासाठी गुजरातची चाकरी;” राष्ट्रवादीने शेलारांना डिवचलं
- “एक पप्पू गेलेत आता दुसरे पप्पूही…;” नवनीत राणांचा आदित्य ठाकरेंना टोला, शरद पवार ही
- “शिंदे गट गुवाहाटीला कुणाचा बळी द्यायला चाललेत माहित नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
- यात्रेसाठी हजारो लोक झटले, घरचेचे कार्य समजून स्वच्छेने काम केले ; काॅंग्रेसने मानले आभार
- शिरूरमध्ये काही तरी शिजतंय? खासदार अमोल कोल्हेंची भाजपशी वाढती जवळीक?